Shivasena Vs Thackeray Group : बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावरील राडा ठाकरे गटाला भोवला…

Share

शिवाजी पार्क पोलिसांकडून मिळाली नोटीस!

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन (Balasaheb Thackeray Death Anniversary) होता. शिवसेनेत पडलेल्या दोन गटांमुळे या दिवशी राडा होणार हे जणू विधीलिखितच होते. तरीही हा राडा टाळण्यासाठी व स्मृतिदिनाला कोणतेही गालबोट लागू नये याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येलाच शिवाजी पार्क (Shivaji park) येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला वंदन करण्यासाठी दाखल झाले. तरीही ठाकरे गटाने (Thackeray Group) जे करायचे तेच केले आणि दोन्ही गटांमध्ये शिवाजी पार्कवर राडा झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्मृतिस्थळावरुन अभिवादन करून बाहेर पडताच ठाकरे गटाचे अनिल देसाई (Anil Desai) आणि अनिल परब (Anil Parab) बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी तिथे दाखल झाले. परब दाखल झाले आणि याच वेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी केला. ठाकरे गटाने घोषणाबाजी, धक्काबुक्कीला सुरुवात केली असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले. स्मृतिस्थळासमोर सुरू असलेला राडा थांबवण्याऐवजी दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत होते.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. प्राथमिक चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. ठाकरे गटाचे पदाधिकारी थोड्याच वेळात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाणार आहेत.

Recent Posts

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

6 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

26 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

46 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

48 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

1 hour ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

2 hours ago