Amitabh Bachchan WC finale : बिग बींनी एकीकडे टीम इंडियाला दिले प्रोत्साहन; तर दुसरीकडे झाले ट्रोल

Share

सेमीफायनल नंतरचं ते ट्विट नेटकर्‍यांच्या लक्षात…

मुंबई : काल क्रिकेट विश्वचषकातील (Cricket World Cup 2023) भारताच्या पराभवानंतर भारतीय संघाला (Team India) अवघ्या भारताकडून पाठिंबा मिळत आहे. पुढच्या सामन्यांमध्ये दमदार खेळी करत राहा अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे क्रिकेटप्रेम तर सर्वश्रुत आहे. त्यांनीही टीम इंडियाला ट्विट करत पाठिंबा दिला आहे. मात्र, न्यूझीलंडसोबत झालेल्या भारताच्या सेमीफायनल सामन्यानंतर केलेल्या एका मजेशीर ट्विटमुळे बिग बींना ट्रोलही केलं जात आहे.

कालच्या सामन्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आपल्या एक्स अकाऊटवरुन एक ट्विट केलं. यात टीम इंडियाला उद्देशून ते म्हणाले, “काल रात्रीच्या सामन्याचा निकाल हा तुमच्या टॅलेंटचं, क्षमतेचं आणि स्थिरतेचं प्रतिबिंब नव्हतं. पण मला तुमचा अभिमान आहे. भविष्यात टीमसाठी चांगल्या गोष्टी घडतील, असंच चांगलं खेळत राहा.” असं म्हणत अमिताभ यांनी टीम इंडियाला प्रोत्साहित केलं आहे.

तर दुसरीकडे काही नेटकरी अमिताभ बच्चन यांनी सेमीफायनल सामन्यानंतर केलेल्या ट्विटमुळे त्यांना ट्रोल करत आहेत. ‘मी जेव्हा सामना पाहत नाही तेव्हा आपण जिंकतो’, असं मजेशीर ट्विट बच्चन यांनी केलं होतं. मात्र, काल पराभवाची चाहूल लागल्यापासूनच ‘बच्चन सामना पाहायला बसलेत का?’, अशा आशयाचे मीम्स व्हायरल होत आहेत. फायनलचा सामना तुम्ही पाहिला नाहीत ना? असा सवाल काहींनी केला. त्यामुळे विश्वचषकाइतकीच बच्चन यांनी सामना पाहिला की नाही याचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Recent Posts

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

1 hour ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

1 hour ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

1 hour ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

2 hours ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

2 hours ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

4 hours ago