Palghar adiavsi : सिमेंटच्या जंगलात पालघरचे आदिवासी जपतायत बहुमोल संस्कृती आणि परंपरा

Share

कशी करतात दिवाळीची तयारी?

मोखाडा : आदिवासी बहुल असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा आदी ग्रामीण भागात आज ही पारंपरिक रिती रिवाज व पिढी जात परंपरांचे जतन केले जात आहे. आधुनिकतेच्या काळात सर्वत्र टोले जंग इमारती, आलिशान घरांना संगमरवरी, रंगी बेरंगी फरशी, मार्बल स्टाईलचे जंगल जगभर निर्माण झालेले असतानाही जव्हार, मोखाड्यासारख्या आदिवासी बहुल भागात आजही दिवाळी सण सुरू व्हायच्या अगोदर या भागातील महिला, नागरिक आपल्या घरात आणि घराबाहेरील मोकळे अंगण मुरुमाच्या साहाय्याने चोपून शेणामातीने सारवून घेतात.

आदिवासी भागातील रोजगार आणि उपजिविकेचे दुर्भिक्ष बघता कुटुंबांच्या दोनवेळच्या पुरेशा उदरनिर्वाहाची मारामारी असणाऱ्या बहुसंख्य आदिवासी कुटुंबांची घरे व घरासमोरील अंगणातील मोकळी जागा आज ही मुरुमाने चोपल्यानंतर शेणाने सारवली जाते. गावालगत असलेला मुरुम खड्डेदार चिकट माती आणल्यानंतर पूर्वीच्या मातीच्या भरावाचे वरवर खोदकाम करुन त्याच्यावर पुरेपूर पाणी टाकले जाते. एकदा का पूर्वीचा मुरुम चिंब भिजला की त्याच्यावरुन नवीन मुरुमांचा पसारा दिला जातो. यानंतर लाकडापासून बनविलेल्या दीड फूट लांब आणि तीन-चार इंच रुंद तसेच वरुन खाली उताराच्या स्वरुपाचे पिटणे चोपण्या च्या साहाय्याने ओला चिंब झालेल्या मुरुमावर जोराने चोप देऊन मुरुम बसविला जातो. असे तीन चार वेळा झाल्यानंतर त्यावरुन शेणाचे सारवण दिले जाते. पुन्हा एकदा दोन चार वेळा चोप देऊन घराचे अंगण किंवा घर मुरुमाने चकचकीत चोपडे बनवले जाते.

Recent Posts

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

17 minutes ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

21 minutes ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

34 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

54 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

1 hour ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

1 hour ago