Uttarakhand tunnel collapsed : उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेत २४ तासांनंतरही बचावकार्य सुरुच

Share

३६ मजूर अजूनही अडकून…

उत्तराखंड : दिवाळीमध्ये (Diwali) सगळीकडे उत्साहाचे वातावरण असताना उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) मात्र एक मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तरकाशी (Uttarkashi) शहरामध्ये निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्याने (Tunnel collapsed) ३६ मजूर आतमध्ये अडकले आहेत. या घटनेला २४ तास उलटल्यानंतरही या मजूरांना बाहेर काढण्यात अद्याप यश आलेले नाही. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असून या कामगारांसाठी पाईपच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.

बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे. या कामगारांनी आपण सुरक्षित असल्याचे कळवले आहे. मात्र, २४ तासांहून अधिक काळ लोटल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. पोकळीतून पडणारा ढिगारा शॉर्ट क्रिएटिंग मशीन वापरून थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, पण या प्रयत्नाला तितके यश येत नाही आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी (Pushkar Singh Dhami) यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, ”SDRF, NDRF आणि राज्य प्रशासनाचे पथक उत्तरकाशीतील सिल्क्यराजवळ बोगद्याच्या बांधकामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करत आहेत.” त्यांनी स्वतः बचाव कार्यावर सतत लक्ष ठेवल्याची माहिती दिली आहे.

पंतप्रधानांनीही फोनवरून घेतली माहिती

हिमाचल प्रदेश येथून परतत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उत्तरकाशीच्या बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या मजुरांची स्थिती, मदत आणि बचावकार्य याबाबत फोनद्वारे सविस्तर माहिती घेतली. पंतप्रधानांनी यासंबंधी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. केंद्रीय एजन्सींना भारत सरकारने मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिली.

Recent Posts

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

9 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

11 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

47 minutes ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

58 minutes ago

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

3 hours ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

3 hours ago