Diwali Abhyangasnan : घरच्याघरी आयुर्वेदिक उटणं? जाणून घ्या तयार करण्याची पद्धत…

Share

दिवाळीला (Diwali Festival) सुरुवात झाली असून सर्वत्र उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. घरोघरी फराळाचा आस्वाद घेतला जातोय तर प्रत्येक घराबाहेर रांगोळ्या, कंदील सजले आहेत. दिवाळीमध्ये अभ्यंगस्नानाला (Diwali Abhyangasnan) विशेष महत्त्व आहे. नरकचतुर्दशीच्या (Narakchaturdashi) दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान केले जाते. पण केवळ दिवाळीच नव्हे तर रोजच उटण्याने आंघोळ करणे शरीरासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असते, असे आयुर्वेद सांगते. परंतु, उटणं बाजारात विशेषतः दिवाळीच्या दिवसांतच विक्रीसाठी उपलब्ध होतं, अन्यथा त्याची उपलब्धता कमी असते. त्यामुळे आजच्या लेखात आपण हे उटणं घरीच कसं बनवायचं हे जाणून घेणार आहोत.

आयुर्वेदिक पध्दतीने उटणे कसे तयार करावे?

उटण्यामध्ये सहसा बेसनाचे पीठ, चंदन पावडर, दुध किंवा गुलाबजल वापरतात. उटण्यामध्ये बेसनाचे पीठ शरीरावरील मृत त्वचा (Dead Skin) काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरते. चंदन पावडरमध्ये कित्येक आयुर्वेदिक गुण आहेत. तिचा उटण्यामध्ये वापर केल्यास त्वचेवरील जास्तीचे तेल निघून जाते. उटण्यामध्ये दुधाचा वापर केल्यास त्वचेवरील काळे डाग दूर होतात आणि चमकही वाढते.

उटणे तयार करण्यासाठी मसूर डाळ पीठ आणि सुगंधी काचोरा प्रत्येकी १०० ग्रॅम घ्यावे. त्यात गुलाब चूर्ण, गुळवेल चूर्ण, जेष्ठमध चूर्ण, चंदन चूर्ण, हळद चूर्ण, कमळ चूर्ण प्रत्येकी ५० ग्रॅम मिसळावे. सर्व चुर्ण वस्त्रगाळ करुन घ्यावीत की झाले उटणे तयार. उटणे वापरण्यासाठी त्यात दूध किंवा तेल टाकून मिश्रण तयार करावे. उटणे अंगाला लावण्याआधी तेलाने मालिश करावी.

Recent Posts

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

22 minutes ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

45 minutes ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

5 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

6 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

6 hours ago