ST Bus Tickets : एसटीची दणक्यात दिवाळी तर प्रवाशांचे निघणार दिवाळे!

Share

तिकीट दरात झाली वाढ…

मुंबई : राज्यभरात सर्वांनाच किफायतशीर असणारा वाहतुकीचा पर्याय म्हणजे एसटी (ST Bus). पण दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने (Maharashtra State Road Transpot Corporation) आपल्या तिकीट दरात (Ticket rates) १० टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत सामान्य माणसाच्या खिशाला आणखी एक कात्री लागणार आहे. मंगळवार, ७ नोव्हेंबरपासून ही दरवाढ लागू होणार असून २७ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांत महागाई खूपच वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यांसोबत भाज्या, कपडे यांचेही दर वधारले आहेत. त्यानंतर आता एसटीचेही भाडे वाढल्याने सामान्य माणसाच्या चिंतेत भर पडली आहे. एसटीची ही दरवाढ साधी, जलद, निमआराम, साधी शयन आसनी, वातानुकूलित शिवाई, शिवशाही या बससाठी करण्यात आली आहे. दरवाढीतून अश्वमेध व शिवनेरीला वगळण्यात आले असून, या बसला पूर्वीचेच दर राहणार आहेत.

नवीन दरानुसार आता छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे प्रवास भाडे ५५५ तर छत्रपती संभाजीनगर ते मुंबई हे भाडे ९१५ रुपये असणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातून पुणे-मुंबईला जाण्यासाठी साध्या बससह शिवशाहीला देखील ५० ते १०० रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत.

दरम्यान, एसटी महामंडळाने घालून दिलेल्या नियमांनुसार खासगी ट्रॅव्हल्स (Private Travels) कंपन्यांनीही दीडपट भाडेवाढ केली आहे. त्यामुळे खाजगी कंपन्यांची दिवाळीही दणक्यात साजरी होणार आहे. परंतु खासगी बसच्या तुलनेत एसटी बसची तिकीट दरवाढ कमी आहे. शिवाय महिलांना पन्नास टक्के सूट तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास याही एसटीच्या सुविधा कायम राहणार आहेत.

Recent Posts

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

17 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

20 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

56 minutes ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

1 hour ago

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

3 hours ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

3 hours ago