Devendra Fadnavis : मालमत्तेचं नुकसान, जाळपोळ करणार्‍यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करा

Share

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करणारे आंदोलक (Maratha Andolak) प्रचंड आक्रमक झाले असून राज्याच्या मालमत्तेचं नुकसान करणारे अनुचित प्रकार ते करत आहेत. बीडमध्ये (Beed) तर आमदाराच्या घरासोबत नगरपरिषदही जाळण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्येही (Chhatrapti Sambhajinagar) भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. शिवाय राज्यात इतरही अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. हे वातावरण राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेला हानिकारक असल्याचे लक्षात राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मालमत्तेचं नुकसान करणार्‍यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मराठा आंदोलन राज्यात हिंसक वळण घेत आहे, या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी काल बैठक घेतली. यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. रात्री १० ते ११ अशी एक तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यभरातील जिल्हाधिकारी व सर्व पोलीस प्रमुख हजर होते. मराठा आंदोलनादरम्यान मालमत्तेचे नुकसान व जीवितहानी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गुन्हे दाखल करुन अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांकडून भरपाई घेण्याबाबत देखील बैठकीत चर्चा झाली.

मनोज जरांगेंचा हिंसेला विरोध

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्‍या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी कुठल्याही प्रकारची हिंसा न करण्याच्या सूचना दिलेल्या असतानाही मराठा आंदोलकांनी अशा प्रकारे राज्यभरात जाळपोळ सुरु केली आहे. मराठा आंदोलकांनी हिंसक होऊ नये, काहीही झालं तरी आपण शांततेच्या मार्गानेच हे आरक्षण मिळवू, असं आवाहन जरांगेंकडून करण्यात आलं आहे. तरीदेखील आजही राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी जाळपोळीचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे फडणवीसांनीही हिंसा करणार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

हे मराठा आंदोलक नव्हे तर समाजकंटक

दरम्यान, अशा प्रकारे हिंसक वागणारे हे मराठा आंदोलक असूच शकत नाहीत. हे कोणत्या तरी समाजकंटकांनी मराठा आरक्षणाच्या नावाखाली केलेलं कृत्य आहे, असं काही मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे. घर जाळणं, त्यातून चोऱ्या करण्याचा उद्देश समाजकंटकांचा आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे अशा समाजकंटकांचाही शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार पोलिसांच्या विविध तुकड्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच गुप्तचर यंत्रणा यावर काम करत आहे.

Recent Posts

बॉलीवूड सेलिब्रिटींनी केले भारतीय जवानांच्या शौर्याचे कौतुक!

श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…

47 seconds ago

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

1 hour ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

1 hour ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

1 hour ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

2 hours ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

2 hours ago