स्वच्छ मधुर पाणी घेऊन
आले तुमच्या भेटी
तहान तुमची भागविण्या
बाग फुलवण्यासाठी…
पर्वतराजीचे घर सोडिता
नाही वळून पाहिले
पुढेच जाणे एवढेच ठाऊक
जगणे हेच मानले…
नाही कसली खंत मनी
दु:ख उरी ना कसले
एकाच जागी थांबून कधी
कुढत नाही बसले…
वाटेमधल्या अडचणींतून
मार्ग काढीत आले
कधी संथ, कधी धावत
तुम्हास येऊन भेटले…
गावाशिवाला वळसा घालून
पुढच्या कामी निघाले
रानावनाला भेटूनी अखेर
सागरास मी मिळाले…
गावोगावी आजही जेव्हा
गुणगुणतात माझी गाणी
त्या गाण्यातून वाहते माझ्या
आयुष्याची कहाणी…
१) कमकुवत अंगामुळे
ताट उभी नसते
कशाचाही आधाराने
ती वाढत बसते
पानं, फुलं, फळं
येतात तिला खूप
सांगा बरं कुणाचं
हिरवंगार रूप?
२) काटेरी अंग तरी
आतून फार गोड
बरका असो, कापा असो
त्याला नाही तोड
पोटात त्याच्या असतात
खूप खूप गरे
कोकणातला ढेरपोट्या
हा कोण बरे?
३) वसईची, जळगावची
असतात ही मस्त
काहीजण एक डझन
करून टाकी फस्त
शरीराला धष्टपुष्ट
करतात ती खरं
पण सालीपाशी कोणाच्या
जपा तेवढं बरं?
उत्तरे :-
१) वेल
२) फणस
३) केळी
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…