Kandivali fire news : कांदिवलीतील इमारतीला भीषण आग; दोघांचा मृत्यू तर तीन जण जखमी

Share

मृतांमध्ये आठ वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश

मुंबई : कांदिवली येथील महावीरनगर परिसरात वीणा संतूर इमारतीला भीषण आग (Kandivali fire news) लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आठ वर्षांच्या एका चिमुकल्याचाही समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल (Fire Brigade) ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यात यश आले असून आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

कांदिवली येथील वीणा संतूर इमारतीच्या ग्राउंड प्लस पहिल्या मजल्यावर दुपारी बाराच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. परंतु आगीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशी लागली, याचा स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तपास करत आहेत.

या आगीत एका चिमुकल्यासह दोघांना आपला जीव गमवावा लागला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ग्लोरी (४३ वर्षे), जोसू रॉबर्ट (८ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. तर लक्ष्मी बुरा (वय ४० वर्षे), राजेश्वरी भरतारे (२४ वर्षे), रंजन शाह (७६ वर्षे) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर सरकारतर्फे उपचार करण्यात येणार आहेत.

Recent Posts

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

32 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

34 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

54 minutes ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

1 hour ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

1 hour ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

2 hours ago