मुंबई : ठाकरे गटाचे (Thackeray group) आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) हे आधीच ५०० कोटी रुपयांच्या पंचतारांकित हॉटेलच्या घोटाळ्यात अडचणीत आहेत. भाजपचे आमदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी त्यांच्याविरोधात केलेल्या आरोपांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यातच आता रवींद्र वायकरांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai Highcourt) सादर केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. राज्य सरकार आमदार निधी वाटपात दुजाभाव करीत आसल्याचा आरोप करणारी ती याचिका होती. मात्र, यासंदर्भात कुठलेही ठोस पुरावे नसल्याचे सांगत हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांच्या आमदार निधी तफावत असल्याचा आरोप करणारी रिट याचिका रवींद्र वायकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांना त्यांच्या राजकीय पक्षांच्या आधारे भेदभाव न करता महाराष्ट्र स्थानिक विकास (MLD) निधीचं समान वाटप करण्यात यावं, मात्र तसं होत नाही आहे. यात भाजप आणि शिंदे गटाच्या काही आमदारांना झुकतं माप दिलं जात असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता.
मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळून शिंदे सरकारला मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे, न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या द्विसदस्य खंडपिठानं याप्रकरणी निर्णय दिला. याचिका गुणवत्तेच्या आधारावर कमकुवत असल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा झटका आहे.
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…