नवी दिल्ली : सियालदह एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरूवारची आहे. गोळीबारानंतर या त्याव्यक्तीला रेल्वेतून उतरवून अटक करण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही.
गोळीबार करताना ही व्यक्ती नशेत तर नव्हती ना याचा शोध पोलीस घेत आहेत.यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
या घटनेदरम्यान सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असलेल्या वकीलाने सांगितले की अचानक घडलेल्या या घटनेने सारेच प्रवासी प्रचंड घाबरले. संपूर्ण ट्रेनची तपासणी केली जावी अशी त्यांची इच्छा होती.
अशाच पद्धतीचे प्रकरण जुलैमध्येही समोर आले होते. तेव्हा पालघर स्टेशनजवळ जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. ३१ जुलैला रेल्वे सुरक्षा दलातील माजी कॉन्स्टेबल चेतन सिंह चौधरी यांनी वरिष्ठ अधिकारी टीकाराम मीना आणि रेल्वेतील तीन अन्य प्रवाशांची गोळी घालून हत्या केली होती.
या प्रकरणी चौधरीवर या गुन्ह्या वापरल्या गेलेल्या हत्यारासह अटक करण्यात आली होती आणि त्याच्याविरोधात हत्या आणि अपहरणाची केसही दाखल करण्यात आली होती. याशिवाय चौधरीवर धर्माच्या आधारावर गटादरम्यान विरोध भडकावण्याचा आरोपही करण्यात आला होता.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…