‘मेरी मिट्टी मेरा देश’ अंतगत नेहरोली येथे कलश संकलन सोहळा संपन्न

Share

वाडा(वार्ताहर)- पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांच्या संकल्पनेतून आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा(meri mitti mera desh) देश उपक्रम देशभर राबवला जात असून त्या अनुषंगाने वाडा तालुक्यातील प्रत्येक गावातील माती कलशामध्ये भरून नेहरोली येथे संकलित करण्याचा भव्य सोहळा मंगळवारी पार पडला.

नेहरोली नाक्या पासून नेहरोली जिल्हा परिषद शाळेपर्यंत अमृत कलशाची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर नाचत मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले.शारदा विद्यालयातील शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांवर लेझीम नाच करत पाहुण्यांचे मनोरंजन केले.वाडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांच्या सूचनेनुसार पार पडला.

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश अभियान राबविणे,तालुका पंचायत समिती स्तरावरील माती कलशाचे संकलन जिल्हा परिषद शाळा नेहरोली येथे करणे आणि अमृतवाटीका तयार करण्यासाठी वाडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा माती कलश संकलन करण्यासाठी वाडा पंचायत समिती सभापती अस्मिता लहांगे, जिल्हा परिषद सदस्य भक्ती वलटे, पंचायत समिती सदस्य, माजी उपसभापती अमोल पाटील, माजी सभापकल रघुनाथ माळी, गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, सामाजिक कार्यकर्त्या मंदाताई कांबळे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत अमृतकलश संकलन सोहळ्या प्रसंगी सरपंच संजना गिंभल, उपसरपंच प्रथमेश भाई ठाकरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

9 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

51 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

54 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago