World Cup: विश्वचषक विजेत्या संघावर ३३ कोटींची बरसात

Share

उपविजेत्याला मिळणार १६ कोटी, आयसीसीने जाहीर केली बक्षीसाची रक्कम

आगामी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील विजेत्यांवर बक्षीसाची अक्षरश: बरसात होणार आहे. विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला ३३.१८ कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला १६.५९ कोटी रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. आयसीसीने विजेते, उपविजेते, उपांत्य फेरीतील आणि गट टप्प्यातील सर्व संघांना बक्षीस रक्कम नुकतीच जाहीर केली.

विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही संघांना प्रत्येकी ६ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. त्याचबरोबर ग्रुप स्टेजपर्यंत पोहचलेल्या संघांना प्रत्येकी ८२ लाख रुपये बक्षीसरुपी दिले जातील.आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल.

भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत एकूण संघ सहभागी होणार आहेत. यजमान भारतासह न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्स यांच्यात अंतिम विजेतेपद पटकवण्यासाठी क्रिकेटच्या मैदानातील युद्ध पहायला मिळेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

18 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

52 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago