Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात

Share

मनोज जरांगे पाटलांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

जालना : मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आंदोलनकर्त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागणीनुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अंतरवाली सराटी गावात दाखल झाले. यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस प्राशन करत अखेर सतराव्या दिवशी जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, संदिपान भूमरे, अर्जून खोतकर आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. दोन सरकारी अधिकारी देखील आंदोलनस्थळी उपस्थित आहेत.

मनोज जरांगे यांनी भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरुन कौतुक केले. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात. ज्याप्रमाणे मी म्हटलं आहे की आपल्या समाजाच्या पदरात आरक्षण टाकूनच घरी जाईन तीच भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. आपल्याला आरक्षण मिळाल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत. आमचं उपोषण सोडण्याकरता ते स्वतः वेळ काढून इथे आले त्याबद्दल त्यांचे स्वागत आणि आभार, अशा भावना जरांगे यांनी व्यक्त केल्या.

महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुमच्याकडून खूप आशा आहेत, आणि त्यांना असं वाटतं की या राज्यात धाडसी निर्णय घेण्याची क्षमता कोणात असेल तर ती फक्त एकनाथ शिंदे साहेबांतच आहे. मीदेखील अख्ख्या समाजासाठी मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आरक्षण मिळवणार आहे. मुख्यमंत्र्यांना एक महिन्याचा वेळ देण्याचा निर्णयदेखील सर्वानुमते घेण्यात आला आहे. समाजाकडून एकमताने सांगण्यात आलं, तेव्हा मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. यापुढे देखील मी आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं.

जरांगे पाटील पुढे म्हणाले, मी तुमच्याशी प्रामाणिक आहे, मी तुम्हाला आरक्षण मिळवून देणार यावर मी ठाम आहे. मला चिठ्ठी देण्यात आली. त्याची लोकांमध्ये चर्चा झाली. पण मी तसले धंदे करत नाही, मी तशी औलाद नाही. मी मराठा समाजासोबत पारदर्शक आहे, मी मराठा समाजासोबत गद्दारी करणार नाही. तुमच्या राजकारणासाठी माझ्या पोरांचे वाटोळे करू नका. आमची आरक्षणाशिवाय काही मागणी नाही, वेळ घ्या पण आम्हाला आरक्षण द्या अशी मराठ्यांची मागणी आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी इथून हलणार नाही आणि मुख्यमंत्र्यांना देखील हलू देणार नाही, असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

16 minutes ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

39 minutes ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

5 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

5 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

6 hours ago