जालना : मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आंदोलनकर्त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागणीनुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अंतरवाली सराटी गावात दाखल झाले. यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस प्राशन करत अखेर सतराव्या दिवशी जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, संदिपान भूमरे, अर्जून खोतकर आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. दोन सरकारी अधिकारी देखील आंदोलनस्थळी उपस्थित आहेत.
मनोज जरांगे यांनी भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरुन कौतुक केले. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात. ज्याप्रमाणे मी म्हटलं आहे की आपल्या समाजाच्या पदरात आरक्षण टाकूनच घरी जाईन तीच भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. आपल्याला आरक्षण मिळाल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत. आमचं उपोषण सोडण्याकरता ते स्वतः वेळ काढून इथे आले त्याबद्दल त्यांचे स्वागत आणि आभार, अशा भावना जरांगे यांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुमच्याकडून खूप आशा आहेत, आणि त्यांना असं वाटतं की या राज्यात धाडसी निर्णय घेण्याची क्षमता कोणात असेल तर ती फक्त एकनाथ शिंदे साहेबांतच आहे. मीदेखील अख्ख्या समाजासाठी मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आरक्षण मिळवणार आहे. मुख्यमंत्र्यांना एक महिन्याचा वेळ देण्याचा निर्णयदेखील सर्वानुमते घेण्यात आला आहे. समाजाकडून एकमताने सांगण्यात आलं, तेव्हा मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. यापुढे देखील मी आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं.
जरांगे पाटील पुढे म्हणाले, मी तुमच्याशी प्रामाणिक आहे, मी तुम्हाला आरक्षण मिळवून देणार यावर मी ठाम आहे. मला चिठ्ठी देण्यात आली. त्याची लोकांमध्ये चर्चा झाली. पण मी तसले धंदे करत नाही, मी तशी औलाद नाही. मी मराठा समाजासोबत पारदर्शक आहे, मी मराठा समाजासोबत गद्दारी करणार नाही. तुमच्या राजकारणासाठी माझ्या पोरांचे वाटोळे करू नका. आमची आरक्षणाशिवाय काही मागणी नाही, वेळ घ्या पण आम्हाला आरक्षण द्या अशी मराठ्यांची मागणी आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी इथून हलणार नाही आणि मुख्यमंत्र्यांना देखील हलू देणार नाही, असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…