कोलंबो: कुलदीप यादवच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने आशिया चषक २०२३मधील(asia cup 2023) सुपर ४ फेरीत श्रीलंकेला ४१ धावांनी हरवले आहे. भारताने विजयासाठी ठेवलेले २१४ धावांचे माफक आव्हानही श्रीलंकेला पूर्ण करता आले नाही.
श्रीलंकेचा संपूर्ण डाव ४१.३ षटकांत १७२ धावांवर आटोपला. पाकिस्तानविरुद्ध पाच बळी घेणाऱ्या कुलदीप यादवने चार गडी बाद करत श्रीलंकेच्या संघाला सुरूंग लावला. जसप्रीत बुमराहने या सामन्यात २ गडी बाद केले. तर रवींद्र जडेजाने २ विकेट घेतल्या.
याआधी टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारता आली नाही. श्रीलंकेच्या जबरदस्त गोलंदाजीसमोर भारताच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. भारताचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने केवळ सर्वाधिक ५३ धावा केल्या. तर इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.
शुभमन गिलने १९ धावा केल्या तर इशान किशन ३३ धावांवर बाद झाला. के एल राहुल ३९ धावा करू शकला. अक्षर पटेलने २६ धावा केल्या. बाकी फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. यामुळे भारताने ४९.१ षटकांत केवळ २१३ धावा केल्या.श्रीलंकेकडून २० वर्षीय दुनिथ वेलालगेने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.
इतके लहान आव्हान असताना श्रीलंका हा सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली आणि श्रीलंकेचा डाव हाणून पाडला. श्रीलंकेकडून धनंजय डी सिल्वाने ४१ तर दुनिथ वेलालगेने नाबाद ४२ धावा केल्या.
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…