IND vs PAK: कुलदीपचा पाकिस्तानला जोरदार ‘पंच’, भारताचा २२८ धावांनी विजय

Share

कोलंबो: आशिया चषक २०२३च्या (asia cup 2023) सुपर ४च्या फेरीतील सामन्यात भारताने (india) पाकिस्तानवर (pakistan) जबरदस्त विजय मिळवला आहे. भारताने पाकिस्तानला थोडेथोडक्या नव्हे तर तब्बल २२८ धावांनी हरवले. राखीव दिवशी रंगलेल्या या सामन्यात भारताने बाजी मारली. भारताने दिलेले ३५७ धावांचे आव्हान गाठताना पाकिस्तानचा घामच निघाला. त्यांना ३२ षटकांत केवळ १२८ धावा करता आल्या.

विराट कोहली आणि लोकेश राहुल यांची प्रत्येकी शतके तर सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २ बाद ३५६ धावांचा डोंगर पाकिस्तानसमोर उभारला होता. हा सामना रविवारी होणार होता. मात्र रविवारी भारताच्या २४.१ षटकांत २ बाद १४७ धावा झाल्या होत्या.पावसाने खोडा घातल्याने सामना सोमवारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर सोमवारी पुन्हा खेळ सुरू करण्यात आला. तेव्हा विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी जबरदस्त शतके ठोकली. राहुलने १०६ चेंडूत १११ आणि कोहलीने ९४ बॉलमध्ये १२२ धावांची नाबाद खेळी केली. दोघांनी १९४ चेंडूत २३३ धावांची भागीदारी केली. त्यांच्या या जबरदस्त खेळीच्या जोरावर भारताने २ बाद ३५६ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाला दीडशे धावांचा टप्पाही गाठता आला नाही. पाकिस्तानचे केवळ चारच फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकले. या सामन्यात कुलदीप यादवच्या गोलंदाजीने किमया साधली. त्याने तब्बल ५ विकेट घेत पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडले. तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवला.

Recent Posts

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

14 minutes ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

18 minutes ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

31 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

51 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

1 hour ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

1 hour ago