Chandrababu Naidu: भ्रष्टाचार प्रकरणात टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडूंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Share

नवी दिल्ली : तेलुगु देसम पार्टीचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांना भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आंध्र प्रदेशातील ३७१ कोटींच्या कौशल्य विकास महामंडळातील घोटाळा प्रकरणार गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांना ही अटक केली. माजी मुख्यमंत्री नायडू यांना १४ दिवस राजमुंदरी सेंट्रल जेलमध्ये ठेवले जाईल. हे पाहता तुरुंगाजवळ कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

नायडू यांना शनिवारी रात्री उशिरा तीन वाजून ४० मिनिटांनी मेडिकल तपासणीसाठी विजयवाडाच्या सरकारी जनरल रुग्णालयात नेण्यात आले होते. याआधी त्यांची १० तास चौकशी करण्यात आली.

एन चंद्राबाबू नायडू यांना कधी केली अटक?

सीआयडीच्या टीमे माजी केंद्रीय मंत्री नायडू यांना शनिवारी सकाळी सहा वाजता नंदयाल शहराच्या ज्ञानपुरम येथील आर के फंक्शन हॉलच्या बाहेर अटक करण्यात आली होती. नायडू जेव्हा आपल्या बसमध्ये झोपले होते तेव्हा त्यांना अटक करण्यात आली.

टीडीपीने काय म्हटले?

एन चंद्राबाबू नायडूचा पक्ष टीडीपीने याबाबतची सर्व माहिती सोशल मीडियावर देत म्हटले की नायडू यांच्याविरोधात खोट्या केस दाखल करण्यात आले आहेत. लोक त्यांच्यासोबत आहेत.

काय आहे प्रकरण?

२०१४मध्ये आंध्र प्रदेशातील बेरोजगार तरुणांसाठी आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. यात ३७१ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना लाचलुचपत प्रतिबंध विभाग न्यायालयाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Recent Posts

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

9 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

11 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

47 minutes ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

58 minutes ago

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

3 hours ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

3 hours ago