Asia cup 2023: श्रीलंकेचा बांगलादेशवर ५ विकेट राखून विजय

Share

पल्लेकल: आशिया चषक २०२३मधील (asia cup 2023) दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशवर ५ विकेट राखून विजय मिळवला आहे. बांगलादेशने पहिल्यांदा फलंदाजी करताना १६४ धावा केल्या. श्रीलंकेच्या तिखट माऱ्यासमोर बांगलादेशच्या संघाला २०० धावांचा पल्लाही गाठता आला नाही.

त्यानंतर श्रीलंकेने १६५ धावांचे आव्हान ३९ ओव्हरमध्ये ५ विकेट राखत पूर्ण केले. श्रीलंकेच्या चरिथ असलंकाने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. तर सदिरा समारवीक्रमाने ५४ धावांची खेळी करत संघाला आव्हान पूर्ण करण्यात मदत केली. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांचे पहिले तीन विकेट झटपट गेले. त्यामुळे श्रीलंकेचा संघ थोड्या दबावात मात्र श्रीलंकेच्या चरिथ असलंका आणि सदिरा समारवीक्रमाने संयम राखत चांगली भागीदारी रचली आणि संघाला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, बांगलादेशने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४२.४ षटकांत सर्वबाद १६४ धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून केवळ एकाच खेळाडूला मोठी खेळी करता आली. बांगलादेशच्या नजमुल हौसेन सांतोने ८९ धावांची खेळी केली. इतर कोणत्याही फलंदाजांना चांगली खेळी करता आली नाही.

याआधीच्या ग्रुप ए मधील पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्यात पाकिस्तानने नेपाळला चांगलेच धुतले. पाकिस्तानने नेपाळवर २५८ धावांनी विजय मिळवला.

Recent Posts

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

4 minutes ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

15 minutes ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

34 minutes ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

2 hours ago

IND vs PAK Tension: प्रत्येक हल्ल्याला चोख उत्तर देऊ, जयशंकर यांनी EUला दिली पाकिस्तान हल्ल्याची माहिती

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…

2 hours ago

भारताने लाहोर-सियालकोटमध्ये केला हल्ला, पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्धवस्त

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…

3 hours ago