नवी दिल्ली: चीनने (china) जारी केलेल्या नव्या नकाशामध्ये अरूणाचल प्रदेश (arunachal pradesh) त्यांचा भूभाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र भारांताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. जयशंकर यांनी मंगळवारी एका न्यूज चॅनेलशी बोलताना चीनच्या या कावेगिरीबद्दल सांगितले, असे निरर्थक दावे करून दुसऱ्यांचा भूभाग आपला होत नाही. त्या प्रदेशावर दावा करण्याची चीनची जुनी सवय आहे. याने काही बदलणार नाही. त्यांनी जो नकाशा सादर केला त्याला काही अर्थ नाही.
चीनने सोमवारी नवा नकाशा जाहीर केल्यानंतर जयशंकर यांनी हे विधान केले आहे. चीनने सादर केलेल्या नकाशामध्ये अरूणाचल प्रदेश राज्य आणि अक्साई चीन भाग त्यांच्या भूभागाचा हिस्सा असल्याचे दाखवले. परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की आमचे सरकार याबाबत खूप स्पष्ट आहे की हे आमचे क्षेत्र आहे आणि तेथे आम्हाला काय करायचे आहे? अशा पद्धतीचे निरर्थक दावे करून दुसऱ्या लोकांचा प्रदेश तुमचा होत नाही.
गेल्या आठवड्यात चीनचे शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील अनौपचारिक बातचीतदरम्यान एलएसी आणि भारत-चीन सीमासह अन्या क्षेत्रांमवरील न सुटलेले मुद्दे उठले होते. पंतप्रधान मोदींनी जिनपिंग यांना भारताच्या चिंतांबाबत सांगितले होते.
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…