KL Rahul: के एल राहुलने वाढवले टीम इंडियाचे टेन्शन

Share

नवी दिल्ली : आशिया चषक २०२३ची (asia cup 2023) सुरूवात ३० ऑगस्टपासून होत आहे. यानंतर भारतीय संघाला (team india) येथेच वनडे वर्ल्डकप (one day world cup) खेळायचा आहे. मात्र त्याआधी भारताचा स्टार विकेटकीपर केएल राहुलने टीम इंडियाचे टेन्शन वाढवले आहे. तो नुकताच दुखापतीतून बरा होत परतला आणि त्याची आशिया कपसाठी निवड करण्यात आली.

मात्र राहुल अद्याप पूर्णपणे फिट नाही. त्याला हलकीशी दुखापत आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले की केएल राहुल आशिया कपच्या सुरूवातीच्या दोन सामन्यात खेळणार नाही. ही माहिती मिळताच चाहत्यांची भीती आणखी वाढली की राहुलची दुखापत वर्ल्डकपचा खेळ बिघडवू नये. वर्ल्डकप ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत खेळवला जाणार आहे.

अनेक महिने क्रिकेटपासून दूर आहे राहुल

भारतीय संघ आशिया कपच्या सुरूवातीच्या सामन्यात २ सप्टेंबरला पाकिस्तान आणि त्यानंतर ४ सप्टेंबराला नेपाळशी भिडणार आहे. राहुल या दोन्ही सामन्यात संघाचा भाग नाहीये. तो स्पर्धेच्या सुपर फोरमध्ये संघासोबत असेल. राहुलची ही दुखापत गेल्या दुखापतीशी संबंधित नाही. राहुल जांघेला झालेल्या दुखापतीमुळे अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे.

त्याला जांघेची दुखापत बरी झाल्यानंतर बुधवारपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतीय संघात विकेटकीपर फलंदाज म्हणन सामील केले होते. द्रविडने आशिया कपच्या रवानगीआधी पत्रकार परिषदेत सांगितले, केएल राुलने आमच्यासोबत चांगला आठवडा घालवला. तो चांगला खेळ करत आहे. वास्तवात चांगली प्रगती करत आहे.

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

22 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

55 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago