बाली : इंडोनेशियामध्ये आज सकाळी सकाळी भूकंपाचे जोरदार झटके बसले. इंडोनेशियाची राजधानी बालीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. ज्यामुळे लोक भयभीत जाले. या भूकंपाची तीव्रता ७.० रिश्टर स्केल इतकी होती. युरोपीय-भूमध्यसागरीय भूकंप विज्ञान केंद्राच्या हवाल्याने रॉयटर्सने ही माहिती दिली.
हा भूकंप इतका तीव्र होता की घरातील सर्व गोष्टी हलू लागल्या आणि लोकांनी आपल्या घरातून पळ काढला. दरम्यान, या भूकंपामध्ये किती नुकसान झाले आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र ज्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का होता त्यावरून जिवितहानीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ईएमएससीच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र इंडोनेशियाच्या मातरम येथून २०१ किमी उत्तरेला आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ५१८ किमी खाली होते. अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार या भूकंपाची तीव्रता ७.१ इतकी होती.
याआधी भारताच्या छत्तीसगडमधील उत्तर क्षेत्र सरगुजा जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी उशिरा भूकंपाचे हलके धक्के जाणवले होते. मात्र या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाल्याची माहिती नाही.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…