Mann ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’चा १०४वा भाग, चांद्रयानच्या मोहिमेवर चर्चा

Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) आज आपल्या मन की बात (mann ki baat) या रेडिओ कार्यक्रमाच्या १०४व्या भागात बोलणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रसारण सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया ट्विटरवरून याची माहिती दिली.सकाळी ११ वाजता ट्यून करा. संपूर्ण भारतातून प्रेरणादायी जीवन प्रवासांना उजाळा देणे ही नेहमीच आनंदाची बाब असते.

मन की बातचा १०३वा भाग ३० जुलैला प्रसारित झाला होता. त्या भागात पंतप्रधान मोदींनी मेरी माटी मेरा देश अभियानाची माहिती दिली होती. मन की बातच्या १०३व्या भागात बोलताना मोदींनी नैसर्गिक आपत्तीबद्दल सांगताना म्हटले की या संकटकाळात भारतातील सर्व देशवासियांनी सामूहिक प्रयत्नांची ताकद दाखवली आहे. स्थानिक लोक, एनडीआरएफचे जवान आणि स्थानिक प्रशासनामध्ये काम करणाऱ्या लोकांनी दिवस-रात्र संघर्ष करून अशा संकटांचा सामना केला आहे.

आजच्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐतिहासिक चांद्र मोहीम चांद्रयान ३च्या चंद्राच्या पृष्ठभागावरील यशस्वी लँडिंगबद्दल बोलणार आहेत. याआधी २३ ऑगस्टला चांद्रयान ३च्या लँडर मॉड्यूलने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे पाऊल ठेवले आहे.

मन की बात कार्यक्रम ३ ऑक्टोबर २०१४मध्ये सुरू झाला आहे ३० एप्रिल २०२३मध्ये या कार्यक्रमाने १०० भाग पूर्ण केले.

Recent Posts

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

3 minutes ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

16 minutes ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

3 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

3 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

4 hours ago