Kokan hearted girl : मुंबई-गोवा महामार्गासाठी कोकण हार्टेड गर्लचे गार्‍हाणे! संगीत खुर्चीचो खेळ आटोपलो असात तर…

Share

कोकणवासीयांचा प्रश्न मार्गी लागणार का?

पळस्पे : सध्या राज्यात खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या वेळी चाकरमान्यांना गावी जाताना अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे १५ हजार कोटींचा खर्च करुनही मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai Goa highway) अजून पूर्ण झालेला नाही. या ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांचा (Potholes) व वाहतूक कोंडीचा (Traffic jam) प्रवाशांना सामना करावा लागतो. या गोष्टीकडे लक्ष देण्याऐवजी निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने महामार्गावरून सध्या राजकारण सुरू आहे. याविरोधी पळस्पे येथे मनसेने आयोजित केलेल्या जागर यात्रेत (MNS Jagar yatra) कोकणची कन्या (Kokankanya) अंकिता प्रमोद वालावलकर (Ankita Pramod Walawalkar) सहभागी झाली आणि सर्वांसमक्ष तिने मुंबई-गोवा महामार्गासाठी गार्‍हाणे घातले.

कोकण हार्टेड गर्ल (Kokan hearted girl) म्हणाली, सरकार बर्‍याच जणांचा असा, त्यामुळे सरकारच्या देवाक आपण गार्‍हाणा घालून बघूया, जर महामार्ग झालो तर चांगलाच असा. जोरदार व्हय महाराजाचो आवाज येऊ देत, असं म्हणत तिने कोकणची व्यथा मांडणारे गार्‍हाणे सुरु केले. ती म्हणाली, तळ्यात मळ्यात आणि संगीत खुर्चीचा खेळ आटोपला असेल तर आमच्या महामार्गाच्या प्रश्नावर लक्ष पडू दे रे महाराजा….
तात्पुरत्या खुर्चीचा खेळ आख्खो महाराष्ट्र बघता पण तात्पुरती मलमपट्टी करुची बंद करा रे महाराजा…
मुंबई गोवा महामार्गाचे जे काही प्रश्न असत जे काय अडचणी असतील ते दूर कर… चांद्रयान चंद्रावर खड्डे आणि पाण्याचा तपास करीलच पण आमच्या महामार्गावरील खड्डे आणि पाण्याच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष पडून दे रे महाराजा…

कोण ही कोकणकन्या?

कोकण हार्टेड गर्ल सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या मालवणी भाषेतील व्हिडीओजमुळे ती महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहे. इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर तिचे लाखोंच्या घरात फोलोअर्स आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तिचं ‘तूच मोरया’ (Tuch Morya) हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे व त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याआधीही बर्‍याचदा तिने कोकणवासीयांचे प्रश्न आपल्या व्हिडीओजच्या माध्यमातून मांडले आहेत. त्यामुळे ती कोकणच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारा एक चेहरा बनली आहे. याचाच वापर करत तिने पुन्हा एकदा गार्‍हाण्याच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न उपस्थित केला आहे. याची सरकार दखल घेणार का आणि गणेशोत्सवाआधी चाकरमान्यांच्या वाट्याला सुखकर प्रवास येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

9 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

29 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

49 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

52 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

1 hour ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

2 hours ago