बंगळुरु : भारताने अद्वितीय अशी कामगिरी करत चांद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहिम यशस्वी केली. चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर आता मुख्य कामाला सुरुवात झाली आहे. यासंबंधीची सर्व माहिती इस्रो (ISRO) सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. नुकतेच विक्रमच्या ChaSTE पेलोडने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मातीचे तापमान मोजले आहे व त्याची प्राथमिक माहिती पाठविली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर केलेली ही पहिली तपासणी आहे. असे करणारा भारत हा पहिला देश आहे. माहितीचा सविस्तर अभ्यास सुरू असल्याचे इस्रोने म्हटले आहे.
इस्रोने शेअर केलेल्या आलेखानुसार चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अंदाजे ५० अंश सेल्सिअस आहे. खोलवर गेल्यावर तापमान झपाट्याने घसरते. ८० मिमीच्या आत गेल्यानंतर, तापमान -१० अंशांपर्यंत खाली येते. सूर्य चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर क्षितिजाच्या खाली किंवा वर फिरतो, त्यामुळे सूर्यप्रकाशाच्या वेळी तापमान १३० °F (५४°C) पेक्षा जास्त होते. शास्त्रज्ञांच्या मते, प्रकाशाच्या या काळातही, उंच पर्वतावर काळ्या सावल्या पडतात. काही खड्डे कायमस्वरूपी सावली असलेल्या भागात आहेत ज्यांनी अब्जावधी वर्षांमध्ये दिवसाचा प्रकाश पाहिला नाही, तेथे तापमान −३३४°F ते −४१४°F (−२०३°C ते −२४८°C) पर्यंत असते.
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश आहे. दक्षिण ध्रुवावरील चंद्राचा पृष्ठभाग, पर्वत आणि दऱ्यांमुळे अतिशय गुंतागुंतीचा आहे आणि मोजणीतील थोडीशी चूक देखील लँडर मोहीम अयशस्वी होऊ शकते. त्याचबरोबर प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरून काढत असलेले फोटो इस्रोच्या स्थानकांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल, अशीही माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, ISRO यामध्ये अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासारख्या इतर देशांच्या ग्राउंड स्टेशनची मदत घेत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर वातावरण नसल्यामुळे सर्व सावल्या गडद दिसत आहेत आणि त्यामुळे स्पष्ट फोटो मिळणे कठीण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…