Shivshakti on Moon : भारताचे चंद्रावरील अढळ स्थान ‘शिवशक्ती’!

Share

विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाचं पंतप्रधानांनी केलं नामकरण

बंगळुरु : भारताने अद्वितीय अशी कामगिरी करत चांद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहिम फत्ते केली. संपूर्ण जगाने याची दखल घेत भारताचे अभिनंदन केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South pole of Moon) उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. या चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. चांद्रयानातील विक्रम लँडर (Vikram Lander) ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला यापुढे ‘शिवशक्ती’ (Shivshakti) या नावाने ओळखलं जाणार आहे. यानिमित्ताने भारताने चंद्रावर आपलं अढळ असं स्थान निर्माण केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्रिक्स परिषदेसाठी (BRICS) दक्षिण आफ्रिका व ग्रीसच्या दौर्‍यावर होते. भारतात दाखल होताच पंतप्रधान बंगळुरु येथील इस्रोच्या (ISRO)मुख्यालयात आले. त्यानंतर शास्त्रज्ञांशी संवाद साधण्यासाठी ते इस्रो कॅम्पसमध्ये पोहोचले. यावेळी भारताचे मून लँडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरले ते ठिकाण ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा केली आहे.

तसेच चांद्रयान-२ ने चंद्राच्या ज्या पॉइंटवर गेलं होतं. त्या पॉइंटला तिरंगा (Tiranga) हे नाव दिलं जाणार आहे, अशी घोषणा मोदी यांनी केली. ‘हा तिरंगा बिंदू भारताच्या प्रत्येक प्रयत्नाची प्रेरणा ठरणार आहे, हा तिरंगा बिंदू आपल्याला शिकवेल की कोणतेही अपयश अंतिम नसते.’ असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. याचबरोवर शास्त्रज्ञांच्या चमूचे अभिनंदन करत त्यांनी अनेक गौरवोद्गार काढले.

जिथे कोणी पोहोचले नव्हते तिथे आपण पोहोचलो

पंतप्रधान मोदी म्हणाले, जिथे कोणी पोहोचले नव्हते तिथे आपण पोहोचलो. आपण ते केले जे यापूर्वी कोणी केले नाही. २३ ऑगस्टचा तो दिवस माझ्या डोळ्यांसमोर प्रत्येक सेकंदाला पुन्हा पुन्हा फिरतोय. टच डाउनची खात्री झाल्यावर इस्रो केंद्रात आणि देशभरात लोकांनी ज्या प्रकारे आनंद साजरा केला, ते दृश्य कोणीच विसरू शकणार नाही. काही आठवणी अजरामर होतात. तो क्षण अजरामर झाला.

तुम्ही रोल मॉडेल आहात

पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोच्या शास्त्रज्ञांना संबोधित करताना म्हणाले, तुम्ही नवीन पिढीचे रोल मॉडेल आहात. तुमचे संशोधन आणि अनेक वर्षांच्या मेहनतीने हे सिद्ध झाले आहे की तुम्ही जे ठरवता ते तुम्ही करून दाखवता. देशातील जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास संपादन करणे ही छोटी गोष्ट नाही. देशातील जनतेचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत.

भारताची गणना आता पहिल्या रांगेत

एक काळ असा होता जेव्हा आपली गणना तिसर्‍या रांगेत व्हायची. आज व्यापारापासून तंत्रज्ञानापर्यंत भारताची गणना पहिल्या रांगेत उभ्या असलेल्या देशांमध्ये होत आहे. तिसऱ्या रांगेपासून पहिल्या रांगेपर्यंतच्या या प्रवासात आपल्या इस्रोसारख्या संस्थांचा मोठा वाटा आहे, असं कौतुक पंतप्रधानांनी केलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

3 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

3 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

3 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

3 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

4 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

4 hours ago