India Japan Relationship : भारतात जपानची गुंतवणूक वाढणार, अनेकविध प्रकल्प येणार…

Share

देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आगामी प्रोजेक्टस

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा जपानमध्ये शासकीय अतिथी म्हणून सन्मान करण्यात आला. आजच ते आपल्या या दौऱ्यावरुन परतले आहेत. परतल्यानंतर मुंबई विमानतळावरच त्यांना पत्रकारांनी घेरलं. यावेळेस भारत- जपान संबंधांविषयी अनेक मुद्द्यांवर ते व्यक्त झाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जपान आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करतंय. मला जपानच्या सरकारने राज्य अतिथी म्हणून त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. मोठ्या प्रमाणात विविध सरकारी अधिकारी मंत्री असतील, पंतप्रधानांचे सल्लागार असतील, अशा सर्व लोकांसोबत बैठका झाल्या. जायकासारख्या ओरिये एजन्सी सोबत त्याच ठिकाणी बैठक झाली. आणि महत्त्वाचं की मुंबईमध्ये जी आपल्याला वर्सोवा ते विरार एक ४२ किलोमीटरची सिलिंग तयार करायची आहे, ज्यामुळे आपल्या एम एम आर रीजन मधलं पूर्ण वेस्टर्न सबर्ब आणि पश्चिमेचा भाग हा सर्व ट्राफिक मुक्त होणार आहे, त्याला संपूर्ण सहकार्य देण्याकरिता त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे आणि त्यांनीही विनंती केली आहे की आपल्या केंद्र सरकारकडून हा प्रस्ताव आपण पाठवावा. त्याचप्रमाणे मुंबईतील मेट्रो लाईन ११, छत्रपती शिवाजी टर्मिनस टू वडाळा अंडरग्राउंड मेट्रो लाईन करण्याकरता त्यांनी अनुकूलता दाखवली आहे.

टोकियोमध्ये त्यांनी फ्लड मिटीगेशन प्रोजेक्ट राबवला आहे. त्यामध्ये साधारणपणे अंडरग्राउंड नेटवर्क तयार करून ज्यावेळी हाईटेड असतो आणि जोरात पाऊस असतो, पाणी फेकता येत नाही त्यावेळी पाणी खाली जमा करायचं असतं. त्यानंतर पाणी वापरायचं किंवा सोडायचं अशा प्रकारची व्यवस्था केलेली असते. हा प्रोजेक्ट आपण मुंबईकरता मागच्याच काळात त्यांच्याकडे दिला होता, आणि तो मंजूर करण्याकरता त्यांनी अनुकूलता दाखवली आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, यासोबत काही गव्हर्नरशी भेट झाली व ते देखील त्यांचे ट्रेड डेलिगेशन्स घेऊन इथे यायला तयार आहेत. त्या संदर्भात आमच्या तारखा वगैरे ठरत आहेत. अनेक मोठ्या कंपन्यांशी चर्चा झाली. सोनी कंपनीने देखील या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यासंदर्भात अनुकूलता दाखवली. मोठ्या प्रमाणात उद्योग आपल्या येथे येण्याकरिता आग्रही आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने आम्ही एक टीम तयार करत आहोत ज्यामध्ये उद्योग विभागाचे मेंबर तर असतील, पण जपानी भाषा बोलणारे देखील मेंबर असतील. सर्व प्रकारची गुंतवणूक आपल्याला महाराष्ट्रात आणता येईल.

जपानच्या विविध व्यवसायिकांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली, त्यावेळी त्यांचं एकच म्हणणं होतं की, आम्ही सर्व इन्व्हेस्टमेंट ही चीनमध्ये केली पण आता आम्हाला ती इन्व्हेस्टमेंट चीनमध्ये सेफ वाटत नाही. त्यामुळे आता आम्हाला भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आम्हाला असं वाटतं की, भारतच असा देश आहे की ज्या ठिकाणी आमची इन्व्हेस्टमेंट सुरक्षित राहू शकते. आम्ही इतर देशांमध्येही गेलो पण ती क्षमता इतर देशांमध्ये नाही, असा विश्वास त्यांनी भारतावर दाखवला, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

1 minute ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

21 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

41 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

43 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

1 hour ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

2 hours ago