मुंबई: चांद्रयान ३च्या (chandrayaan 3) यशस्वी लँडिंगनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेतून ऑनलाईन पद्धतीने चांद्रयान ३चे लँडिंग पाहिले. जसे लँडर विक्रमने चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवले तसे इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी जाहीर केले की आपण चंद्रावर पोहोचलो. प्रमुखांनी इतकं म्हणताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हातात झेंडा घेऊन फडकावू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत होते.
पंतप्रधान याबाबत म्हणाले जेव्हा आपण इतिहास बनताना पाहतो तेव्हा जीवन धन्य होते. अशा ऐतिहासिक घटना आपल्या आयुष्यात चिरंजीव चेतना बनून राहतात. हा क्षण विकसित भारताचा शंखनाद आहे. हा क्षण नव्या भारताचा जयघोष आहे. हा क्षण कठीण महासागर पार करण्याचा आहे. हा क्षण विजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा आहे. हा क्षण अविस्मरणीय आहे.
मोदी म्हणाले, हा क्षण भारताच्या विजयाचा आहे. आम्ही धरतीवर संकल्प केला आणि चंद्रावर तो साकार केला. आज आम्ही अंतराळात नव्या उड्डाणाचे साक्षीदार बनले आहेत. मोजी म्हणाले हा क्षण १४० कोटी लोकांसाठी उमंग देणारा आहे.
आम्ही ब्रिक्स परिषदेत भाग घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत आहोत मात्र माझे मन चांद्रयान ३ जवळच बोते. मी चांद्रयान ३ आणि इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. या अद्भुत क्षणासाठी १४० कोटी देशवासियांना कोटी कोटी अभिनंदन करतो.
भारत चंद्राच्या त्या दक्षिण ध्रुवावर पोहोचला आहे जेथे जगातील अद्याप कोणत्याच देशाला जाता आलेले नाही. आता चंद्राबाबतचे सर्व गैरसमज दूर होतील. कथानके बदलतील आणि नव्या पिढीसाठी म्हणीही बदलतील.
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…