आई मीसुद्धा लिहिणार
ताज्या नवीन कविता
कवितेच्या खाली लिहीन
माझे टोपणनाव ‘सविता’…
राम गणेश गडकरींचे
जसे नाव ‘गोविंदाग्रज’
वि. वा. शिरवाडकरांचे
जसे नाव ‘कुसुमाग्रज’…
‘केशवकुमार’ नावाचे होते
प्रल्हाद केशव अत्रे
‘बी’ नाव धारण करणारे
नारायण मुरलीधर गुप्ते…
‘संत रामदास’ नाव ज्यांचे
ते नारायण सूर्याजी ठोसर
‘आरती प्रभू’ नावाचे होते
चिं. त्र्यं. खानोलकर…
कृष्णाजी केशव दामलेंना
‘केशवसुत’ म्हणे, जो तो
त्र्यंबक बापूजी ठोंबरेंना
‘बालकवी’ सारेच म्हणतो…
आत्माराव रावजी देशपांडे
कवी ‘अनिल’ नाव लावत
माणिक गोडघाटेंना सारे
‘ग्रेस’ म्हणूनच ओळखत…
आई यांच्या कवितांनी
आनंदाची फुलवली बाग
यांची कविता चक्क बोलते
म्हणते हवे ते माग…
मीही आज कविता लिहून
लाविला कवितेचा दिवा
माझ्याही कवितेने घ्यावा
तुमच्या हृदयात विसावा…
१) दातातील कीड, बरी करते
अन्न टिकवायला, उपयोगी पडते
पादेलोण, सैंधव, त्याचे साथीदार
आयोडिन त्यांच्यात, असते फार
प्रमाण वाढले की, आरोग्य बिघडते
मिरच्यांच्या सोबतीने, मसाल्यात दिसते
सागरापासून थेट, येई ते घरात
सर्व रसांचा राजा, कोणास म्हणतात?
२) पिवळीधम्मक दिसे ही, सगुणाबाई
तिच्याशिवाय स्वयंपाकाचं, पान हालत नाही
जंतुनाशक गुण तिचा, उपयोगी भारी
खरचटल्यावर लावताच, करे जखम बरी
चुन्यासोबत आल्यावर, कुंकू तयार होते
अंगाला चोळल्यास, उजळपणा देते
रोजच्या जेवणात, घरगुती उपचारात
कोणती बरं वनस्पती, हमखास वापरतात?
३) खेळ खेळता येतो, हिशेब ठेवता येतो
माहितीचा खजिना, उघडून नवा देतो
मेल पाठवून पत्राचे, मिळवतो उत्तर
मनोरंजन करायला, सदा असतो तत्पर
घरबसल्या खरेदी, त्याच्यामुळे होई
ऑनलाइन बँकिंगला, वेळ लावत नाही
पदोपदी माणसाच्या, उपयोगी पडतो
कोण हा मित्र, जगाशी जोडतो?
उत्तर :-
१) मीठ
२) हळद
३) संगणक
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…