नितीन गडकरींनी पराभव मान्य केला पण उदय सामंत यांनी घेतली शपथ

Share

पुढच्या एका वर्षात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण करण्याचा विडा उचलला

अलिबाग : देशभरात रस्ते बांधकामात नावाजलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: आपण कोकणातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेकदा प्रयत्न करुनही पूर्ण करु शकलो नाही, याची खंत जाहीरपणे व्यक्त केली आहे. मात्र आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा रखडलेला विकास पूर्ण होण्याच्या दृष्टीने राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जनभावनांचा आदर करीत महामार्ग एका वर्षात पूर्ण करण्याबाबत शपथ घेतली आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या पूर्णतेसाठी सातत्याने वेगवेगळ्या संस्थाकडून आंदोलन व मागण्या होत आहेत. तसेच कोकणातील पत्रकारांनी आज वाकण येथे बोंबाबोंब आंदोलन करून निषेधाचे दहा हजार संदेश पाठविण्याचे नियोजन केले आहे.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार, अन्य संघटना आणि कोकणवासियांच्या भावना समजून घेत या महामार्गाच्या बांधकामासाठी स्वतः कटिबद्ध असल्याचे आश्वस्त करताना पत्रकारांना आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले.

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत आंदोलनकर्त्यांच्या, आपल्या सर्वांच्या भावना व कोकणवासीयांच्या भावना याच माझ्या देखील भावना आहेत. आपला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात विभागला आहे. मी पालकमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा महामार्ग पूर्ण झाला आणि तसाच माझा प्रयत्न रायगड आणि रत्नागिरीसाठी आहे. काही ठेकेदारांच्या तांत्रिक अडचणीमध्ये हायवे अडकला आहे. मी स्वतः केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह हा प्रश्न सोडविण्यासाठी बैठका घेतल्या आहेत. तरीही अपयश येतेय, याची मला कल्पना आहे. पण मी आपणास शब्द देतो की, पुढच्या एका वर्षात काहीही करून हा हायवे पूर्ण करू करण्याची मी खात्री देतो.

तुमच्या भावनांचा आदर करून मी शपथ घेतो की, पुढच्या एका वर्षात हा हायवे पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, असे याप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले.

Recent Posts

Jammu Drone Attack : पाकड्यांची मस्ती काय थांबेना! जम्मूत ड्रोन हल्ला, पठाणकोठमध्ये स्फोट, जम्मूमध्ये ब्लॅकआऊट

जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…

27 minutes ago

थेट प्रहार! पाकिस्तानमधील गाणी, सिरीज, चित्रपट भारतात थांबवा!

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…

30 minutes ago

IND-PAK तणावादरम्यान शिफ्ट झाला IPL चा सामना, आता धरमशाला नव्हे तर या ठिकाणी होणार सामना

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये रविवार,…

31 minutes ago

Gold rate: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर…

1 hour ago

PBKS vs DC, IPL 2025: धरमशालामध्ये पाऊस थांबला, पंजाब किंग्सची पहिली फलंदाजी

धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात आज पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे.…

1 hour ago

पाकिस्तानकडून तणाव वाढवण्याचा प्रयत्न निष्फळ, भारताचे जशास तसे प्रत्युत्तर

नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…

2 hours ago