मुंबई : भारतीय रिझर्व बँकने (आरबीआय) १९ मे रोजी दोन हजारांच्या नोटा चलनातून माघारी घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर बँकांमध्ये २३ मेपासून दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यात येत आहेत. मात्र अद्यापही तब्बल ४२ हजार कोटी रुपयांच्या नोटा जमा केलेल्या नाहीत. या नोटा कुणाकडे असतील, यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२३ पर्यंत दोन हजार रुपयांच्या एकूण ८८ टक्के नोटा बँकिंग प्रणालीमध्ये परत आल्या आहेत.
आरबीआयच्या माहितीनुसार, १९ मे २०२३ पर्यंत ३.५६ लाख कोटी किंमतीच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनामध्ये होत्या. त्यापैकी ३१ जुलै पर्यंत ३.१४ लाख कोटी रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. त्यामुळे आता फक्त ४२ हजार कोटी रुपयांच्या नोटा चलनामध्ये उरल्या आहेत. ३० सप्टेंबर २०२३ ही दोन हजारांच्या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची शेवटची तारीख आहे.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…