नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही वाहनांची तोडफोड

Share

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न संवेदनशील, उपायुक्त मोनिका राऊत यांना आव्हान

नाशिकरोड : सोमवारी पहाटे विहीतगाव येथे दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड करून जाळण्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त भुसारे यांची उचलबांगडी केली होती. मात्र विहितगावच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा धोंगडे नगर परिसरात पुन्हा चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने नाशिक रोड परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न संवेदनशील बनला आहे. यामुळे सामान्य जनतेमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

राजलक्ष्मी हॉल, धोंगडे नगर या ठिकाणी सोमवारी मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी कोयते व तलवारीच्या सहाय्याने चार गाड्यांचा काचा फोडत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

नाशिक रोड परिसरात मागील काही दिवसांपासून घडणाऱ्या तोडफोडीच्या घटनांमुळे सामान्य जनतेमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातो आहे.

पोलीस यंत्रणा कायदा सुव्यवस्था निर्माण करण्यास सपशेल अपयशी ठरली आहे, अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिक देताना दिसत आहे.

धोंगडे नगर येथील तोडफोडीच्या घटनेसंदर्भात येथील अतुल धोंगडे यांनी संशयित आरोपींचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आरोपींनी तोंडाला काळे कापड बांधले असल्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. दुचाकी वरून हे आरोपी पसार झाले.

दरम्यान परिमंडळ दोनच्या नवनियुक्त उपायुक्त मोनिका राऊत यांच्यापुढे नाशिक रोड परिसरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रित करण्याचे मोठे आव्हान ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

9 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

11 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

47 minutes ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

58 minutes ago

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

3 hours ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

3 hours ago