नाशिक: नाशिक (Nashik) शहरातील सुरक्षिततेवर एकंदरीतच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. काही दिवसांपूर्वी सिडको परिसरात १६ वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच काल मध्यरात्री विहितगाव (Vihitgaon) परिसरात युवकांनी चक्क कोयता मिरवत गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ केली आहे.
नाशिक शहरातील उपनगर परिसरातील रामकृष्ण हाऊसिंग सोसायटी विहित गाव येथील पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या दुचाकी आणि रस्त्यालगत उभे असलेल्या मालवाहू टेम्पो आणि काही चार चाकी गाड्यांचे या समाजकंटकांनी नुकसान केले आहे. गाड्यांची तोडफोड करत दुचाकी जाळत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून संतप्त नागरिकांनी पोलिसांवरती रोष व्यक्त करत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सोबतच रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाने योग्य ती खबरदारी न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दरम्यान, दोन संशयितांनी केलेल्या जाळपोळीचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पहाटे दोन वाजता कोयता घेऊन संशयित वाहनतळात आले. ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांनी वाहनतळातील दुचाकी पेटवून दिल्या. नंतर रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांवर कोयत्याने हल्ला करत परिसरात दहशत पसरविली.
दोन संशयितांनी केलेल्या जाळपोळीचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पहाटे दोन वाजता कोयता घेऊन हे वाहनतळात आले. ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांनी वाहनतळातील दुचाकी पेटवून दिल्या. नंतर रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांवर कोयत्याने हल्ला करत परिसरात दहशत पसरविली.
घटनेचा संपूर्ण व्हिडिओ:
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…