मुंबई : राज्यात पावसाने माजवलेल्या हाहाकारामुळे (Heavy rainfall) अनेक शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी पावसाच्या आगमनाने आनंदलेला शेतकरी पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला (Vidarbha and marathwada) तर याचा जोरदार फटका बसला आहे. या प्रश्नाबाबत विरोधकांनी अधिवेशनात आवाज उठवला होता. त्यावर शासनाकडून तातडीने निर्णय घेण्यात आला असून याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.
पावसाळी अधिवेशनादरम्यान आज विधानपरिषदेमध्ये निवेदन सादर करताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पाच हजार ऐवजी १० हजारांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. अजित पवार म्हणाले, अन्नधान्य व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दुर्घटनेचा प्रसंग घडला तर ताबडतोब त्या ठिकाणी धान्य पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांना धान्य शिजवणं शक्य नसेल त्यांना शिजवलेले धान्य बंद पॅकेट्समधून वाटण्यात येईल. तसेच पुराच्या ठिकाणी रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छता करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
अजित पवार म्हणाले की, २३ जुलै रोजी राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, अकोला या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले होते. अशा ठिकाणी बचाव कार्य करण्यात आले आहे. याठिकाणी मंत्र्यांनी भेटीही दिल्या आहेत. वायुदल, एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF) यांची मदत घेऊन अनेक लोकांना वाचवण्यात आले आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकार धावले आहे. तसेच जिल्ह्यातील पिकांची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…