पंढरपूर (वृत्तसंस्था) : ‘बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव, तुकाराम, पंढरीनाथ महाराज कि जय’ च्या जयघोषाने खुडूस (Khudus) येथील माउलींचे रिंगण (Ringan) पार पडले. यावेळी अतिशय शिस्तबद्ध आणि उत्साह संचारलेला दिसला. दुसरीकडे तुकोबारायांच्या पालखीचे माळीनगर (Malinagar) येथे उभे रिंगण संपन्न झाले. दरम्यान, सोमवारी माउलींची आणि सोपानदेव यांची बंधुभेट होऊन पालखी भंडीशेगाव येथे मुक्कमी असणार आहे. तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रवेश पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे राहणार आहे. आता भाविकांना सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची (Vitthal Darshan) आस लागली आहे.
माउलींची पालखी माळशिरस येथून प्रस्थान ठेवून खुडूस फाटा येथे रविवारी सकाळी पोहोचली. येथील मैदानावर माउलीच्या पालखीचे दुसरे रिंगण संपन्न झाले. भव्य मैदानावर गोलाकार भाविकांची गर्दी दिसून आली. हातात भगवी पताका, टाळ मृदुंगाचा , हरीनामाचा जयघोष आणि रिंगण सोहळा पाहण्याची उत्सुकता भाविकांना लागली होती. रिंगणाच्या ठिकाणी माउलीची पालखी विराजमान झाली. त्यानंतर माउलींचे अश्व आले. चोपदाराने इशारा करताच उपस्थित भाविकांनी ‘बोला पुंडली वरदे’चा जयघोष केला. टाळ – मृदुंग आणि ‘माउली माउली’ च्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून गेला आणि अश्वाने गोल फेरी पूर्ण केली. त्यानंतर पालखी सोहळा वेळापूर येथे विसावला. माउलीची पालखी सोमवारी वेळापूर येथून प्रस्थान ठेवून ठाकुरबुवा समाधी येथे तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे संत सोपानदेव यांची बंधुभेट करून भंडीशेगाव येथे मुक्कमी असणार आहे.
तर दुसरीकडे जगद्गुरू तुकारम महारज यांच्या पालखीने अकलूज येथून प्रस्थान ठेवले आणि पालखी माळीनगर येथे पोहोचली. या ठिकाणी उभे रिंगण पार पडले. तुकोबारायाचा नगारखाना त्यानंतर पालखी आणि पाठोपाठ अश्व आले. दुतर्फा भाविकांनी रांगा लावल्या होत्या. विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात अश्वाने उभी दौड पूर्ण करून पालखीला नमस्कार करून रिंगण सोहळा संपन्न झाला. या नंतर विविध खेळ खेळून भाविकांनी मनमुराद आनद घेतला. या नंतर पालखी बोरगाव येथे मुक्कमी पोहचली. आज पालखी पंढरपूर तालुक्यात प्रवेश करून पिराची कुरोली येथे मुक्कमी असणार आहे.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…