Accident: रत्नागिरी हादरले! दापोलीत वाहनाचा झाला चक्काचूर, चिमुकल्यांवर काळाचा घाला

Share

रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात दापोली (Dapoli) हर्णै राज्य मार्गावर आसूद येथे रविवारी दुपारच्या सुमारास ट्रक व मॅजिक प्रवासी रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघात (Fatal accident) काहीजण जखमी झाले आहेत.

ट्रक आणि मॅजिकच्या भीषण अपघातातील मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. या अपघातात हर्णै येथील प्रवासी मॅजिक गाडीचालक अनिल उर्फ बॉबी सारंग यांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे मोठी खळबळ उडाली असून प्रथमदर्शनी ट्रक चालकाच्या चुकीमुळे चार जणांना जीव गमवावा लागल्याचा अंदाज आहे.

अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघात जिथं झाला तिथं स्थानिकांसह वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे. काही जखमी प्रवाशांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर काही प्रवाशांना पुढील उपचार करता पाठवण्यात आले आहे.

मरियम गौफिक काझी ६ वर्षे, स्वरा संदेश कदम ८ वर्षे, संदेश कदम, ५५ वर्ष, अनिल सारंग ४५ वर्षं, फराह तौफिक काझी, २७ वर्ष अशी मृतांची नावे आहेत.

जखमींची यादी

१) विनायक हशा चौगुले-४५ पाजपंढरी
२) श्रध्दा संदेश कदम-१४ अडखळ
३) मिरा महेश बोरकर-२२ पाडले
४) भुमी सावंत-१७ हर्णे (मुंबई ट्रान्सफर)
५) मुग्धा सावंत-१४ हर्णे (मुंबई ट्रान्सफर)
६)वंदना चोगले-३८ पाजपंढरी
७)ज्योती चोगले-०९पाजपंढरी
८)विनोद चोगले-३० पाजपंढरी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

3 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

3 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

3 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

4 hours ago