मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांना खडबडून जाग आली आसून आज अकरा वाजल्यापासून ते बिहारमधील पाटण्यामध्ये (Patna Opposition Meeting) बैठक घेणार आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) नाव जगभर गाजत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षांना हे पाहवत नसल्याने ते आज एकत्र येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ‘विरोधकांना चिंता मुलाबाळांची’ असं म्हणत विरोधकांची खिल्ली उडवली. तर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) व भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पाटण्यात आजच्या बैठकीला उपस्थित राहणारे उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
विरोधकांच्या बैठकीला लक्ष्य करत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “नरेंद्र मोदीजींनी आपल्या भाषणात म्हटलं की माझा सन्मान म्हणजे १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. एकीकडे पंतप्रधान भारताला उंची देण्याचं काम करत असताना दुसरीकडे विरोधक पाटण्याला एकत्र येत आहेत. खरं तर विरोधकांचं त्यांच्या मुलाबाळांची चिंता करण्याकरता एकत्रीकरण सुरु आहे. सोनिया गांधींना राहुल गांधी मुख्यमंत्री हवे आहेत, शरद पवारांना सुप्रिया सुळेंना पुढे आणायचंय, उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंची चिंता आहे, त्यामुळे विरोधकांनी जरी एकत्र मुठी बांधल्या तरी त्यांना मुलाबाळांची चिंता आहे म्हणून ते हे करत आहेत”, अशी जोरदार टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली.
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) थेट आव्हान दिलं. औरंगाबाद की छत्रपती संभाजी महाराज नगर? उस्मानाबाद की धाराशिव? अहमदनगर की पुण्यश्लोक अहिल्यानगर? काँग्रेस की हिंदुत्व? कबर की स्मारक? औरंगजेब की सावरकर? असे प्रश्न आशिष शेलारांनी उपस्थित केले आणि याच प्रश्नांची होर्डिंग्ज लावून ते उद्धव ठाकरेंना थेट सवाल करणार आहेत असं त्यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हटलं आहे.
ज्या मेहबुबा मुफ्तींनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं म्हणून तुम्ही आयुष्यभर टोमणे मारले, त्याच मेहबुबा मुफ्तींसोबत तुम्ही आज बैठकीसाठी बाजूला बसणार आहात का? असा सवाल मनसेच्या संदीप देशपांडेंनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, याचा अर्थ दुसर्याने केली तर ती गद्दारी आणि स्वतः केली तर ती देशभक्ती अशी दुहेरी भूमिका कशी काय कोणाची असू शकते? स्वतःच्या स्वार्थाची वेळ आली की वेगळे निकष आणि दुसर्यांसाठी वेगळे निकष, असा टोलाही त्यांनी लगावला.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…