शेवगाव : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात सातत्याने खून, दरोड्याच्या घटना घडत आहेत. त्यातच आज अहमदनगरमधील शेवगाव (Shevgaon) येथील भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन गंगाकिशन बलदवा (वय ५५ वर्ष) यांच्या राहत्या घरावर आज २३ जूनला भल्या पहाटे तीन ते चारच्या दरम्यान चोरट्यांनी दरोडा टाकल्याने खळबळ उडाली आहे. यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू तर एकजण जखमी झाला. घरातील काही ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन पुढील तपास सुरु केला आहे.
गोपीकिशन बलदवा व त्यांच्या मोठ्या भावजय पुष्पा हरिकिशन बलवा (वय ६५ वर्ष) या दोघांचा या दरोड्यामध्ये झालेल्या मारहाणीदरम्यान मृत्यू झाला, तर गोपीकिशन यांच्या पत्नी सुनिता बलदवा जखमी झाल्या आहेत. दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यामध्ये लोखंडी सळईच्या सहाय्याने वार केल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. या दरोड्याच्या निषेधार्थ आज शेवगाव बंद पुकारण्यात आला आहे. व्यापारी आणि ग्रामस्थांनी ही बंदची हाक दिली असून पोलिसांनी तातडीने घटनेचा छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली तसेच घटनास्थळी व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी व्यापाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. यासंदर्भात ते म्हणाले, “शेवगाव शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या भागांमध्ये दरोडा पडणे आणि त्यात दोन जणांचा मृत्यू होणे ही मोठी गंभीर घटना आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेचा तातडीने तपास करावा आणि आरोपींचा शोध घ्यावा,” शहरांमध्ये या पद्धतीने गंभीर गुन्हे होणे होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कामावर मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.
दरोडेखोरांनी प्रथम गौरव बदलवा यांच्या घराला बाहेरुन कडी लावली व नंतर वेगळ्या मार्गाने गोपीकिशन बदलवा यांच्या घरात प्रवेश करुन झोपेत असतानाच त्यांच्या डोक्यावर गजाने प्रहार केला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चोरी करताना पुष्पा बदलवा जाग्या झाल्याने त्यांनाही जीवे मारले. या घटनेत तीन चोरटे दुचाकी वाहनावरुन आल्याचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये दिसत असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक बी. चंद्रकात रेड्डी, पो. नि. विलास पुजारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपासासाठी श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…