मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची शनिवारी १० जूनला राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र उबाठा सेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून या निर्णयावर टीका करण्यात आली आहे. ‘एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष का?’ असा सवाल सामनाच्या आजच्या अग्रलेखातून विचारण्यात आला. त्यावर राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळेंनी मात्र ‘ही लोकशाही आहे, इथे कोणलाही काहीही बोलण्याचा अधिकार’ म्हणत नरमाईची भूमिका घेतली आहे.
‘काही जणांच्या मते शरद पवार यांनी भाकरी फिरवली, पण त्यात काही दम वाटत नाही. भाकरी फिरवली नसून ती आता कुठे चुलीवर टाकली आहे. भाकरी कच्ची राहू नये म्हणून ती फिरवावीच लागते. आधीची भाकरी करपल्याने नवीन भाकरी थापली असेल तर वाट पाहावी लागेल’, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.
यावर सुप्रिया सुळे शांतपणे म्हणाल्या, ‘ही दडपशाही नव्हे, लोकशाही आहे. त्यामुळे कुणालाही काहीही बोलण्याचा अधिकार आहे. त्यात गैर काय? ते त्यांचं मत आहे’. त्यामुळे महाविकास आघाडीतच फूट असली तरी सुप्रिया सुळेंनी त्यावर काहीही बोलायचे टाळले आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…