मुंबई : अदानी इलेक्ट्रिसिटी आणि विकासकाच्या बेजबाबदारपणामुळे पदपथाच्या दिव्याच्या उघड्या वीजवाहिनीचा शॉक लागल्याने सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना सांताक्रूजमधील वाकोला येथे घडली. याच दुर्घटनेत पाच वर्षांचा चिमुकला जखमी झाला आहे. त्याच्यावर व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वाकोल्यातील चैतन्यनगर येथे काल (२ जून) रात्री ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत तेहरीन इफ्तिकार या सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर तनिष शिंदे हा पाच वर्षीय मुलगा जखमी झाला आहे.
हे दोघेही काल रात्री दहा वाजताच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला खेळत होती. ज्या ठिकाणी ते खेळत होते तिथे एक पथदिवा आहे. त्याची वीज वाहिनी मोकळीच होती. खेळता खेळता या मुलांचा स्पर्श वीज वाहिनीला झाला आणि दोन्ही मुले खाली कोसळली. जखमी अवस्थेत त्या मुलांना स्थानिकांनी व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे उपचारादरम्यान तेहरीन इफ्तिकारचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची पूर्ण जबाबदारी अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकाऱ्यांची आणि बाजूला काम सुरु असलेल्या विकासकांची आहे. त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी, अशी मागणी संतप्त स्थानिक नागरीकांनी केली आहे.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…