मुंबई : आयपीएल सुरु झाल्यापासून क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात शुभमन गिल हे नाव गुंजत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळीसोबतच शुभमनने ऑरेंज कॅपवरही कब्जा केला आहे. या मोसमात त्याने १६ सामन्यांत ८५१ धावा केल्या आहेत. यामुळे विराट कोहलीचा विक्रमही मोडण्याच्या तो तयारीत आहे. आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक ९७३ धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे.
शुक्रवारी, क्वालिफायर-२ मध्ये ५ वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्स विरोधात १२९ धावांची तूफान खेळी केली. गिलने चौथ्या सामन्यात तिसरे शतक झळकावले. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.
मुंबई विरोधात खेळताना २३ मे रोजी त्याने अवघ्या ४९ चेंडूत शतक झळकावले. १७ व्या षटकात १२९ धावांची इनिंग खेळून तो बाद झाला. ६० चेंडूत १२९ धावा करत गिलने आयपीएल प्लेऑफमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. त्याच्या आधी पंजाब किंग्जच्या वीरेंद्र सेहवागने २०१४ मध्ये सीएसके विरुद्ध १२२ धावा केल्या होत्या.
शुभमन गिलने १२९ धावांच्या खेळीत ७ चौकार व १० षटकार मारले. प्लेऑफमध्ये यापूर्वी कोणत्याही फलंदाजाने एवढे षटकार मारले नव्हते. त्याच्या आधी हा विक्रम ऋद्धिमान साहाच्या नावावर होता. त्याने २०१४ च्या फायनलमध्ये केकेआर विरुद्ध ८ षटकार ठोकले होते.
गिलने या मोसमात ७८ चौकार व ३३ षटकारांसह तब्बल १११ बाउंड्रीज मारल्या आहेत. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक चौकारांचा विक्रम जोस बटलरच्या नावे आहे. त्याने २०२२ मध्ये १२८ चौकार ठोकले होते. आता या हंगामातील अंतिम सामन्यात १८ चौकार मारून गिल हा विक्रम मोडू शकतो.
शुभमन गिलने गेल्या ४ सामन्यांत आयपीएलमधील तिसरे शतक ठोकले. अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला, याआधी विराट कोहली व जोस बटलरने ६ डावांत ३ शतके ठोकण्याचा विक्रम केला होता.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…