कोलकाता (वृत्तसंस्था) : वरुण चक्रवर्तीची दमदार गोलंदाजी आणि नितीश राणा, आंद्रे रसेल यांची फटकेबाजी त्याला मिळालेली रिंकू सिंहची निर्णायक खेळी पंजाबविरुद्धच्या सामन्यात कोलकातासाठी यशस्वी ठरली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात रिंकू सिंहने शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत कोलकाताला विजय मिळवून दिला.
पंजाब किंग्जने दिलेले १८० धावांचे लक्ष्य गाठताना कोलकाता नाईट रायडर्सला बरी सुरुवात मिळाली. सांघिक फलंदाजी करत कोलकाताने विजय सोपा केला. त्यात कर्णधार नितीश राणाने ५१ धावांचे योगदान दिले. आंद्रे रसेलची बॅट चांगलीच तळपली. त्याला रिंकू सिंहने छान साथ दिली. त्यामुळे कोलकाताने फटकेबाजी करत सामना आपल्या बाजूने वळवला होता. परंतु शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत कोलकाताला झुंजवले. कोलकाताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची आवश्यकता होती. थरारक अशा या सामन्यात रिंकू सिंहने शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत कोलकाताला विजय मिळवून दिला. रसेलने ४२ धावा फटकवल्या. रिंकू सिंहने १० चेंडूंत नाबाद २१ धावा फटकावत कोलकाताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. रिंकूची ही खेळी निर्णायक अशी होती. पंजाबचा अर्शदीप सिंग महागडा गोलंदाज ठरला असला तरी त्याने शेवटचे निर्णायक असे षटक अप्रतिम टाकले. राहुल चहरने पंजाबकडून चांगली गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत २३ धावा देत २ विकेट मिळवल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. प्रभसिमरन अवघ्या १२ धावा काढून तंबूत परतला. प्रभिसमरन याच्यानंतर भानुका राजपक्षे यानेही विकेट फेकली. एका बाजूला विकेट पडत असताना शिखर धवनने संयमी फलंदाजी केली. धवनने पंजाबच्या डावाला आकार दिला. त्याने ४७ चेंडूंत ५७ धावांची खेळी केली. या खेळीत धवनने नऊ चौकार आणि एक षटकार लगावला. नितीश राणाने धवनची खेळी संपुष्टात आणली. लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांना चांगली सुरुवात मिळाली होती. पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात हे दोन्ही फलंदाज अडकले. कर्णधार शिखर धवनच्या अर्धशतकाच्या बळावर पंजाबने निर्धारित २० षटकांत सात विकेटच्या मोबदल्यात १७९ धावांपर्यंत मजल मारली. शाहरुख खान आणि हरप्रीत ब्रार यांनी अखेरच्या षटकांत दमदार फलंदाजी केली. कोलकात्याकडून वरुण चक्रवर्ती याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. आंद्रे रसेलने एक षटक टाकले पण तो महागडा ठरला. त्याला एका षटाकात १९ धावा चोपल्या. पंजाबच्या फलंदाजांनी रसेलच्या एका षटकात ४ चौकार लगावले.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…