राज्यात २० दिवसांचाच रक्तसाठा शिल्लक

Share

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत दररोज ५५० युनिट, तर राज्यात १,५०० युनिट रक्ताची गरज भासते. सध्या राज्यात ६ मे पर्यंत केवळ ५८ हजार ८१८ युनिट रक्त साठा उपलब्ध आहे. हा रक्त साठा पुढील २० दिवस पुरेल इतका आहे. त्यामुळे लोकांनी पुढाकार घेत रक्तदान करावे तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहसंचालक डॉ. महेंद्र केंद्रे यांनी राज्यातील जनतेला केले.

रक्तदान सर्वांत श्रेष्ठ दान असे म्हटले जाते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. मुंबईसह राज्यभरात राज्य रक्त संक्रमण परिषद मान्यताप्राप्त रक्तपेढ्या, पालिका, सामाजिक संस्था, मंडळे यांच्याकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करत गरजूंना रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. मात्र आता सुट्ट्या असल्याने लोक आपापल्या गावी जातात. त्यामुळे रक्तदान करण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. त्यामुळे रक्तदान शिबीर आयोजित करत रक्तदान करावे, तसेच रक्तदान करण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. महेंद्र केंद्रे यांनी केले. दरम्यान राज्यात रक्तपेढींची संख्या ३५० आहे. तर मुंबईत ५७ रक्तपेढी आहेत.

रक्तदात्यांनो रक्तदानासाठी पुढे या!
मुंबईत दररोज साधारण ५५० युनिटपर्यंत रक्त रुग्णालयांमध्ये लागते. सध्या २० दिवस पुरेल इतका रक्तसाठा असला तरी हा रक्ताचा तुटवडा आहे. रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र आवश्यकतेनुसार रक्त उपलब्ध करण्यात येत आहे. त्यामुळे छोट्या रक्तपेढ्यांनी रक्तदान शिबीरे आयजित करावीत. तसेच रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. केंद्रे त्यांनी केले.

Recent Posts

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

3 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

23 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

43 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

45 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

1 hour ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

2 hours ago