बदलापूर (वार्ताहर): बडोदा ते जेएनपीटी महामार्गाचे काम सध्या महाराष्ट्रात प्रगतिपथावर आहे. हा महामार्ग बदलापूरमधून जात असून त्यामुळे भविष्यात बदलापूरला थेट पनवेल आणि जेएनपीटी कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. सोबतच बदलापूरजवळ लॉजिस्टिक हब उभारणीला या महामार्गामुळे चालना मिळणार असून पर्यायाने उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधीही येणार आहेत. त्यामुळे या महामार्गासोबतच ‘समृद्धी’ची दारे उघडली जाणार आहेत. या महामार्गामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा फायदा होणार असून डोंबिवली, कल्याणनंतर बदलापूरमध्ये जागेचे आणि घरांचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
बडोदा ते जेएनपीटी महामार्गाचे काम सध्या महाराष्ट्रात जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील तलासरी ते रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील करंजाडे गावापर्यंत हा महामार्ग असेल. महाराष्ट्रात १८९ किमी लांब आणि १२० मीटर रुंद असा हा आठ पदरी महामार्ग असेल. हा रस्ता अंबरनाथ तालुक्यात बदलापूर शहराजवळून जात असून त्यामुळे बदलापूर शहराला भविष्यात बडोदा आणि जेएनपीटीची थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. बदलापूरच्या बेंडशीळ गावाजवळ सध्या या रस्त्याचे काम जोरात सुरू आहे. सोबतच बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा खोदण्याचे काम बेंडशीळ गावाजवळ सुरू करण्यात आले आहे. तब्बल साडेचार किमी लांबीचा हा बोगदा पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानुसार जानेवारी २०२५ पर्यंत बोगद्याचे काम पूर्ण होईल, तर जून २०२५ पर्यंत या संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होऊन रास्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…