दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिषेक शर्मा आणि हेनरिच क्लासेन यांची वादळी खेळी सनरायजर्स हैदराबादच्या विजयात शनिवारी महत्त्वाची ठरली. मयांक मार्कंडेने प्रभावी गोलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सला विजयापासून ९ धावांनी दूर ठेवले.
प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर भोपळाही न फोडता माघारी परतला. त्यानंतर फिल सॉल्ट आणि मिचेल मार्श यांनी फलंदाजीची सूत्रे हाती घेत दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. या जोडीने शतकी भागिदारी साजरी केली. ही जोडी सेट झाल्याने दिल्लीच्या विजयाच्या आशा अधिक होत्या. परंतु ५९ धावा करणारा फिल रॉल्ट बाद झाल्यानंतर दिल्लीच्या फलंदाजीला गळती लागली. पुढच्याच षटकात नवखा फलंदाज मनीष पांडे स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर ६३ धावा करणाऱ्या मार्शचाही संयम सुटला. तळात अक्षर पटेलने २९ धावांची फटकेबाजी केल्याने दिल्लीला निर्धारित षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १८८ धावांपर्यंतच मजल मारता आली. हैदराबादच्या मयांक मार्कंडेने ४ षटकांत २० धावा देत २ बळी मिळवले.
अभिषेक शर्मा याचे वादळ आणि क्लासेनच्या झंझावाताच्या बळावर सनरायजर्स हैदाराबादने निर्धारित २० षटकांत सहा विकेटच्या मोबदल्यात १९७ धावांपर्यंत मजल मारली. अभिषेकने ३६ चेंडूंत ६७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १२ चौकार आणि एक षटकार लगावला. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर क्लासेनने फलंदाजीची सूत्रे हातात घेतली. त्याने अब्दुल समदसोबत ३३ चेंडूंत ५३ धावांची भागिदारी केली. अब्दुल समद बाद झाल्यानंतर अकिल हुसेनच्या साथीने हैदराबादच्या डावाला फिनिशिंग टच दिला. क्लासेनने २७ चेंडूंत नाबाद ५३ धावांची झंझावाती खेळी केली. या खेळीत त्याने चार षटकार आणि दोन चौकार लगावले. अब्दुल समदने २१ चेंडूंत २८ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार लगावले. अकिल हुसेनने १० चेंडूंत नाबाद १६ धावांची खेळी केली. दिल्लीकडून मिचेल मार्शने भेदक मारा केला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत मिचेल मार्शने चार षटकांत २७ धावा खर्च करत चार विकेट घेतल्या. मिचेल मार्शने एक निर्धाव षटक टाकले. अक्षर पटेलने ४ षटकांत २९ धावा देत एक विकेट घेतली.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…