अश्रूधूर नव्हे आंदोलकांनी वणवा लावल्याचा उदय सामंत यांचा दावा

Share

राजापूर : बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला असे विरोधकांचे म्हणणे आहे. मात्र अश्रूधूर नव्हे तर आंदोलकांनी वणवा लावल्याचे व तो वणवा पोलिसांनी विझवल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसे फूटेज विविध वृत्तवाहिन्यांनी टीपल्याचेही सामंत यांनी सांगितले.

बारसू प्रकल्पाच्या जमिनीचं सध्या माती सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण रोखण्यासाठी बारसू आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांना सर्वेक्षण स्थळी जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला आहे. माध्यमांशी बोलताना अनेक आंदोलकांनी याबद्दल माहिती दिली.

याठिकाणी माती सर्वेक्षण केले जात असताना आंदोलकांनी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या दरम्यान पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. यावेळी महिलांना मारहाण झाल्याचा दावा काही आंदोलकांनी केला आहे. आता आम्ही मागे हटणार नाही. मारले, डोके फोडले तरी आम्ही पुढे जाणार. सात-आठ बायकांना पोलिसांनी मारल्याचे स्थानिक महिलांनी सांगितले.

मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या कार्यालयातून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आंदोलकांनीच गवताला आग लावल्याचा दावा केला. सामंत म्हणाले, “अश्रूधुराच्या नळकांड्या कुठेही फोडण्यात आलेल्या नाहीत. आंदोलकांनी गवताला जी आग लावली, तो वणवा विझवताना तो धूर आलेला आहे. अशा वेड्यावाकड्या बातम्या बाहेर जात आहेत. काहीतरी गैरसमज आहे. तिथे वणवा लावण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला होता. ते विझवायचा पोलीस प्रयत्न करत होते, त्यातून आलेला तो धूर आहे.”

Recent Posts

बॉलीवूड सेलिब्रिटींनी केले भारतीय जवानांच्या शौर्याचे कौतुक!

श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…

11 minutes ago

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

1 hour ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

1 hour ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

2 hours ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

2 hours ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

2 hours ago