मुरूड : मुरूड राजवाडा येथील घरी परत येत असताना मध्यरात्री १२:३० च्या सुमारास मुरूड मधील इर्टिगा कारचा तोल सुटून गाडी १५ ते २० फूट दरीत पडून अपघात झाला. गाडीतील सहा प्रवाशांपैकी तीन प्रवासी जखमी झाले आहेत.
मुरूड मधील डांगे यांच्या कुटुंबातील मुलीचा नुकताच विवाह सोहळा पार पडला होता. दुसऱ्या दिवशी मुलीच्या सासरी सत्यनारायणाची पूजा होती. त्या निमित्ताने डांगे कुटुंब मुलीच्या सासरी पुजेसाठी गेले होते. रात्री परतीच्या प्रवासात राजवाडा सोडल्यानंतर मुरूड नजिकच आल्यावर उतारात अचानक गाडीचा वेग वाढला. त्यामुळे चालक गाडी सावरु शकला नाही. समुद्रालगत असलेल्या संरक्षक कठड्यावरुन ही गाडी पंधरा वीस फूट खोल दरीत कोसळली. या गाडीत असणा-या सहा प्रवाशांपैकी तीन जखमी झाले आहेत. जखमींना नजिकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाला उपचारांकरता मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…