निफाड : अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे वादळी वाऱ्यामध्ये लासलगाव येथे दीड एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाले आहे.
लासलगाव कोटमगाव रोड लासलगाव बाजार समिती जवळ येथील शेतकरी प्रल्हाद कमलाकर पाटील यांचा दीड एकर द्राक्ष बाग भुई सपाट झाली. त्यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या संकटातून सावरायचे कसे? असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला आहे.
लासलगाव येथील शेतकरी प्रल्हाद पाटील यांच्या एस.एस.एन व्हरायटीचा द्राक्ष बाग हार्वेस्टिंगच्या टप्प्यात असतानाच वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडल्याने जवळपास आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी याच द्राक्ष बागेची व्यापाऱ्याकडून पाहणी करण्यात आली होती. या द्राक्षांना ५० ते ५५ रुपये दर मिळाला असता. ही द्राक्ष रसिया येथे एक्सपोर्ट करण्यात येणार होती. परंतु वादळी वाऱ्यामुळे होत्याचे नव्हते झाले आणि संपूर्ण द्राक्ष बाग जमीनदोस्त झाल्याने पूर्ण द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता हे व्यापारी द्राक्ष बाग पाहून परत जात आहेत.
शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पोटच्या पोराप्रमाणे द्राक्ष बाग वाढवली असतानाच अस्मानी संकटांनी घाला घातला. यात संपूर्णत: द्राक्ष बाग उद्ध्वस्त झाल्याने प्रल्हाद पाटील यांचे मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागेची नुकसान झाले आहे. हे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…