१. लवंगी मिरची मालिकेबद्दल काय सांगशील?
ही नवीन मालिका एक वेगळ्या कथेसह आली आहे, त्यात मध्ये बोलली जाणारी भाषा कोल्हापुरी आहे. या मालिकेचं शीर्षक ज्या मुलीला दिले गेले आहे, त्या मुलीच्या आईची भूमिका मी साकारत आहे. जशी लवंगी मिरची खूप तिखट असते तसेच माझ्या मुलीचे पात्र करणारी अस्मी देखील खूप तिखट आहे. या मालिकेमध्ये एक डायलॉग आहे, ‘समोरचा जेवढा खट, अस्मी तेवढीच तिखट.’ एकूणच मालिकेतील वातावरण गावाकडचे आहे, म्हणजे जगण्याची पद्धत दाखवली आहे. तर अशी ही मालिका आहे आणि मला खात्री आहे प्रेक्षकांना सुद्धा ही मालिका खूप आवडेल.
२. तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील?
या मालिकेत मी अस्मिच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. आतापर्यंत तुम्ही बघितल असेल की तिची आई स्वभावाने अतिशय निरागस, मितभाषी आणि खूप साधी आहे, ती खूप प्रेमळ आहे. सर्वांबरोबर प्रेमाने वागते, तिने स्वतःची एक खानावळ सुद्धा उभी केली आहे. तिच्या आधीच्या प्रवासात तिला खूप अडथळे आले, तिला तीन मुली आहेत तरीही तिने एकटीने स्वकर्तृत्वावर खानावळ उभी केली. ती निरागस असल्यामुळे लोक तिचा गैरफायदा घेऊ शकतात, तिला काहीही बोलू शकतात, पण अस्मी असल्यामुळे तिच्या आईला आणि तिच्या दोन बहिणींना काही काळजी नाही कारण त्यांना माहित आहे की घरात कोणीतरी आहे जो त्यांचे
रक्षण करेल.
३. तुझ्या सहकलाकारांबद्दल काय सांगशील ?
खरं सांगायचं तर खूप छान वाटतंय. या मालिकेची माझी टीम / सहकलाकार ज्यांच्या बरोबर मी काम करतेय, आमची एक छान ट्युनिंग झाली आहे. त्यामुळे काम करायला खूप मज्जा येते. आम्ही खूप धम्माल करतो. एक वेगळी भाषा बोलायला मिळतेय त्यामुळे तर लय
भारी वाटते.
४. तुझ्या वैयक्तिक अनुभवाबद्दल सांग / आता पर्यंतचा प्रवास?
मी या आधी सुद्धा झी मराठी बरोबर मालिकेत काम केलय. तयामुळे पुन्हा झी मराठीसोबत काम करताना खूप आनंद होतोय, आणि मला अभिनयाची खूप आवड आहे. मी नेहमी माझ्या कामाचा आनंद घेते, आणि त्यात देखील झी मराठी सारखी वाहिनी ही खूपचं वेगळी भावना आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…