संजय राऊत नालायक माणूस, त्याचे संरक्षण काढा!

Share

आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

मुंबई : विधीमंडळाचा ‘चोरमंडळ’ असा उल्लेख करणा-या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत एकेरी भाषेत सडकून टीका केली.

संजय राऊत सारख्या नालायक माणसाकडून दुसरी कोणतीही अपेक्षा नाही. हे विधिमंडळ नसते तर तो खासदार पण झाला नसता. थोडी जरी लाज राहिली असेल तर त्याने खासदारकीचा राजीनामा द्यावा. चौकाचौकात त्याची धिंड काढली पाहिजे. संजय राऊतला आमच्या हवाले करा, जेणेकरून त्याची धिंड काढू शकतो. संजय राऊत याच्यावर कायदेशीर प्रक्रिया झालीच पाहिजे, संजय राऊतची सरकारने सुरक्षा काढावी, अशी मागणी नितेश राणे यांनी विधानसभेत केली.

संजय राऊतचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे. तो सामनात येण्याआधी त्याचे सर्व लेख शिवसेनेच्या विरोधात होते. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचे पटत नाही, असे संजय राऊतने लिहिले होते. राऊतांना दिलेले संरक्षण काढा. ते पोलिसांचे संरक्षण घेऊन फिरतात. ते सरकारने दिलेले संरक्षण आहे,” असे नितेश राणे यांनी म्हटले.

तसेच आपल्याला रोज सकाळी संजय राऊतचे ऐकावे लागते. महाराष्ट्राला याची गरज आहे का? असा सवालही नितेश राणे यांनी केला.

त्याचे मार्मिकमध्ये छापलेले कार्टून बघा. देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल असे छापू शकतात का? त्यांना शिव्या देऊ शकतात का? संजय राऊतांचे १० मिनिटे संरक्षण काढायला सांगा, ते उद्या सकाळी परत दिसणार नाही, एवढा शब्द देतो,” असे वक्तव्य राणेंनी केले.

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

13 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

47 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago