मुंबई : प्रेम (LOVE) म्हणजे काय? प्रेम हे सांगून होत नाही… आणि प्रेम हे ठरवून करता येत नाही… सर्वात महत्वाचं म्हणजे आताच क्षण जगून घ्या… पुढे काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही… मराठी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट बॉय अशी ओळख असलेल्या अभिनेता स्वप्नील जोशीचा (Swapnil Joshi) हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
मराठीतील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी, सध्या बराच चर्चेत आहे. मध्यंतरी केलेली पायी वारी असो, ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये विशेष भूमिका असो किंवा ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतील सौरभ पटवर्धन. स्वप्नील हा कायमच प्रेक्षकांना भावाला आहे. विशेष म्हणजे यशाच्या इतक्या मोठ्या शिखरावर असूनही तो सर्वांशी आपुलकीने वागताना दिसतो. आज त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही खुलासे केले आहेत.
स्वप्नील जोशी याने लहानपणापासून अभिनय क्षेत्रात काम केले आहे. आजवर त्याने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. प्रत्येक भूमिकेने त्याला एक वेगळी ओळख दिली आहे आणि प्रत्येक भूमिकेतून त्यातून तो काही तरी शिकत आला आहे, याच विषयी तो एका मुलाखतीत बोलला आहे. नुकतीच त्याने ही मुलाखत सोशल मिडियावर शेयर केली आहे.
स्वप्नीलने अभिनयाची सुरुवात वयाच्या नवव्या वर्षी केली. त्याने रामानंद सागर यांच्या ‘उत्तर रामायण’ या टीव्ही मालिकेत रामपुत्र कुशची भूमिका साकारली होती. तिथूनच त्याच्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात झाली. त्यानंतर त्याने रामानंद सागर यांच्याच ‘श्रीकृष्ण’ या हिंदी मालिकेमध्ये भगवान श्रीकृष्णाची भूमिका केली होती. स्वप्नीलच्या या दोन्ही भूमिका चांगल्या गाजल्या होत्या. त्याशिवाय एका लग्नाची दुसरी गोष्ट, मुंबई पुणे मुंबई, मितवा, तु ही रे, अशी न संपणारी लिस्ट आहे.
२०१३ साली संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या चित्रपटातील स्वप्नीलच्या अभिनयाने लोकांचा मनात कायमचं घर केलं आहे.
एका मुलाखतीत अमृता खानविलकरने स्वप्नीला त्याच्या वेग वेगळ्या भूमिकेतून तो काय शिकला हा प्रश्न विचारला, स्वप्नीलने मस्त उत्तर दिले, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट मधल्या घणाने मला साधेपणा शिकवला, दुनियादारीतल्या श्रेयस ने मैत्री.. दुनियादारी शिकवली.’
मुंबई पुणे मुंबई मधल्या गौतमने ‘प्रेम म्हणजे काय? प्रेम हे सांगून होत नाही.. आणि प्रेम हे ठरवून करता येत नाही’ हे शिकवलं आणि सर्वात महत्वाचं मी श्री कृष्णाच्या भूमिकेतून शिकलो ते म्हणजे ‘आताच क्षण जगून घ्या.. पुढे काय होईल ही आपल्याला सांगता येत नाही.’ स्वप्नीलचा हा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…